टीम इंडियाला टॉपवर नेणारा, शाळेतील पोरांचे क्लास घेतलेला कोच!

WhatsApp Group

World Cup 2023 Team India Coach T Dilip : भारतीय क्रिकेटमध्ये उच्चस्तरीय प्रशिक्षक होण्यासाठी प्रथम त्याची क्रिकेट कारकीर्द लक्षात घेण्यात येत होती. पण आता सध्याचे प्रशिक्षक हा प्रकार बदलत आहेत. हैदराबादचा माजी डावखुरा फिरकीपटू आर श्रीधर हा भारतीय संघाचे हेड कोच रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफचा भाग होता आणि ही धारणा बदलणारा तो पहिला माणूस होता. पण यानंतर सध्याचे फील्डिंग कोच टी दिलीप यांनी कोच म्हणून मान मिळवण्यासाठी मोठा स्टार असण्याची गरज नाही हा समज पूर्णपणे बदलला आहे. तुम्हाला प्रथम श्रेणी क्रिकेटर असण्याचीही गरज नाही, कारण तुम्ही खेळाडूंना किती चांगली कामगिरी करून दाखवू शकता हे महत्त्वाचे आहे. वर्ल्डकप 2023 बद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक सामन्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला विशेष पुरस्कार दिला जातो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला हा पुरस्कार मिळाला.

ड्रेसिंग रूममध्ये आपल्या भाषणाने सर्वांना आकर्षित करणारे टी. दिलीप यांनी राज्य क्रिकेट अकादमीच्या ज्युनियर खेळाडूंना कोचिंग दिले आहे. त्यांनी आयपीएल संघ डेक्कन चार्जर्समध्ये असिस्टंट फील्डिंग कोच म्हणून काम केले आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये दहा वर्षे घालवली. त्यांचा प्रवास रंजक होता, कारण त्यांच्या कुटुंबाने त्याच्या क्रिकेट महत्त्वाकांक्षेला कधीच पाठिंबा दिला नाही, त्यांना शाळेतील मुलांना गणिताचे क्लास घेण्यास भाग पाडले जेणेकरून, ते त्यांच्या कोचिंगसाठी निधी उभारू शकतील.

बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, दिलीप हे खूप मेहनती कोच आहेत. त्यांनी बेसबॉल कोच माइक यंग यांचे असिस्टंट म्हणून काम केले, जे डेक्कन चार्जर्सचे हेड फील्डिंग कोच होते. त्यांनी लेव्हल 2 आणि 3 अभ्यासक्रमांमध्ये चांगले निकाल आणले. त्यांनी आर. श्रीधर यांच्यासोबत ANICA मध्ये काम केले आहे. टी. दिलीप यांच्या हाताखाली एनसीएमध्ये शुबमन गिल, तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल यांसारख्या युवा खेळाडूंसोबत काम केले आहे.

हेही वाचा – BAN Vs SL : श्रीलंकेचा वर्ल्डकपला राम राम, बांगलादेश जिंकली पण…

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेले सर्व आठ सामने जिंकले आहेत आणि हे निश्चित आहे की ते टेबलमध्ये नंबर-1 वरच राहतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. 12 नोव्हेंबरला राऊंड रॉबिनच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. जसप्रीत बुमराहपासून केएल राहुलपर्यंत सर्वांना या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment