उच्च रक्तदाबाला हायपर टेन्शन असेही म्हणतात. यात कोणतीही लक्षणे नसल्यामुळे याला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात. हा एक गंभीर आजार आहे, जो इतर अनेक गंभीर आजारांना जन्म देऊ शकतो.
2017 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, दर आठ भारतीयांपैकी एकाला उच्च रक्तदाबाची समस्या आहे. एवढेच नाही तर उच्च रक्तदाब हे भारतातील अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अशा स्थितीत ही समस्या नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
चांगली गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींसोबत नियमित योगासन केल्याने बीपीची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, अनुलोम विलोम नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी करणे चांगले मानले जाते. अनुलोम विलोम केल्याने फुफ्फुसे मजबूत होतात, ज्यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो आणि श्वसनाचे आजार बरे होतात. असे केल्याने व्यक्तीचा ताणही दूर होतो.