

IND vs ENG 4rth Test | टीम इंडियाने रांची कसोटीत इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. सोमवारी चौथ्या दिवशी भारताने 5 गडी गमावून 192 धावांचे लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडिया पाच सामन्याच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज ध्रुव जुरेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
चौथ्या दिवशी ध्रुव जुरेलने टॉम हार्टलीच्या चेंडूवर दोन धावा करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारतासाठी, कर्णधार रोहित शर्मा (55) आणि शुबमन गिल (52*) यांनी दुसऱ्या डावात अर्धशतके झळकावली. त्याच्याशिवाय ध्रुव जुरेलने 39 धावांची नाबाद खेळी खेळली. गिल आणि जुरेल यांच्यात नाबाद 72 धावांची भागीदारी झाली. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक 3 बळी घेतले. टॉम हार्टली आणि जो रूटला 1-1 विकेट मिळाली.
टीम इंडियाने चौथ्या दिवशी 40/0 च्या स्कोअरसह आपला दुसरा डाव पुढे नेला. तत्पूर्वी तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात इंग्लिश संघ दुसऱ्या डावात 145 धावांत सर्वबाद झाला होता. पहिल्या डावात इंग्लंडच्या 46 धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताला 192 धावांचे लक्ष्य मिळाले. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 353 रन्सवर ऑल आऊट झाला, तर भारत 307 रन्सवर ऑल आऊट झाला.
हेही वाचा – आता एकटी महिलाही होऊ शकणार आई..! केंद्र सरकारचा सरोगसीच्या नियमांमध्ये बदल
भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघाने 61 षटकांत पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि 12 वर्षांची मालिका जिंकण्याच्या इंग्लंडच्या आशा धुळीस मिळवल्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी मालिका केवळ औपचारिक आहे, जी 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळली जाईल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!