कॅन्सर, डायबेटिसच्या गोळ्या झाल्या स्वस्त..! पॅरासिटामॉलही ‘एवढ्या’ रुपयात मिळणार; वाचा नवे दर!

WhatsApp Group

Medicine Prices Reduced : सरकारने कर्करोग, मधुमेह, ताप आणि हिपॅटायटीससह अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांचे दर ४० टक्क्यांनी कमी केले आहेत. सरकारच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीत (NLEM) समाविष्ट केलेल्या ११९ औषधांची कमाल किंमत निश्चित केल्यामुळे हे घडले आहे. आगामी काळात NLEM मध्ये समाविष्ट असलेल्या आणखी काही औषधांच्या जास्तीत जास्त किमती निश्चित करण्याचा सरकारचा मानस आहे. तापामध्ये वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलच्या किमतीत आता १२ टक्क्यांनी घट झाली आहे.

नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग (NPPA) अथॉरिटीच्या बैठकीत, या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या ११९ प्रकारच्या फॉर्म्युलेशनसाठी प्रति टॅबलेट-कॅप्सूलची कमाल किंमत निश्चित करण्यात आली आहे. ज्या मुख्य औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत त्यात तापाचे औषध पॅरासिटामॉल, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, मलेरियाच्या उपचारात वापरले जाणारे औषध यांचा समावेश आहे.

हेही वाचा – Old Pension Scheme : पेन्शनधारकांसाठी चितेंची बातमी..! जुन्या योजनेबाबत फडणवीस म्हणाले, “सरकार आता…”

खालील औषधांच्या किमती ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.

  • Allopurinol – ५.०२ रुपये
  • Tamozolomise – ३९३ रुपये
  • Sofosbuvir – ४६८ रुपये
  • Clarithromycin – ३४ रुपये
  • Letrozole – २६.१५ रुपये
  • Heparin – १८ रुपये
  • Fluconazole – २६.५ रुपये
  • Cefixime – १९.७ रुपये
  • Metformin – ३.११ रुपये
  • Paracetamol – १.७८ रुपये
  • Hydroxychloroquine – १२.३१ रुपये

हेही वाचा – Horoscope Today : ‘या’ राशीच्या लोकांच्या समस्या वाढतील…! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

दरवर्षी कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ

जगभरात दरवर्षी कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. भारतातही दरवर्षी कॅन्सरचे १३ लाख नवे रुग्ण येत आहेत. आता तर लहान वयातही लोक या आजाराला बळी पडत आहेत ही चिंतेची बाब आहे. वयाच्या पन्नाशीपूर्वीच स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि तोंडाच्या कर्करोगाची प्रकरणे समोर येत आहेत. स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणे महिलांमध्ये दिसून येत आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. २५ ते ४० वयोगटातील अनेक प्रकरणे समोर येत आहेत.

भारतातही मधुमेहाने साथीचे स्वरूप धारण केले आहे. दरवर्षी या आजाराचे प्रमाण वाढत आहे. टाईप-२ मधुमेह मुलांमध्येही दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की २०२५ पर्यंत भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये १२ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सध्या देशातील सुमारे ७७ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. यापैकी सुमारे १३ दशलक्ष लोक ६५ वर्षाखालील आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment