

IPL 2023 Virat Kohli Texts BCCI Officials : आयपीएलमध्ये, 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंजक सामना झाला. हा सामना आरसीबीने जिंकला. त्या सामन्यात विराट कोहलीने 31 धावांची खेळी केली होती. पण, त्याच्या खेळीपेक्षा त्याने सामन्यानंतर काय केले किंवा मधल्या मैदानात नवीन उल हक आणि गौतम गंभीरमध्ये काय घडले, याचीच जास्त चर्चा झाली. या वादाला 5 दिवस उलटले आहेत. पण, तो अजूनही चर्चेचा विषय आहे. दरम्यान, लखनऊ सुपरजायंट्सचा मेंटॉ़र गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांच्यासोबत मैदानावर झालेल्या भांडणानंतर विराट कोहलीने बीसीसीआयला पत्र लिहिल्याची बातमी समोर आली आहे. या वादात आपली चूक नाही आणि आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे विराटने पत्रात म्हटले आहे.
दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, 100 टक्के मॅच फी कापल्यानंतर विराट कोहलीने निराशा व्यक्त केली आहे. या वृत्तानुसार, कोहलीने आपल्या पत्रात लिहिले आहे की, लखनऊचा खेळाडू नवीन-उल-हक किंवा मेंटॉर गौतम गंभीर यांना काहीही बोलले नसल्याचे सांगितले. या वादानंतर विराट आणि गौतम दोघांची 100 टक्के मॅच फी कापली गेली. तर नवीन-उल-हकला 50 टक्के दंड ठोठावण्यात आला.
हेही वाचा – IPL 2023 CSK Vs MI : रोहित शर्मा पुन्हा झिरोवर OUT..! धोनीनं केला ‘गेम’; पाहा Video
Virat Kohli writes to BCCI officials after a fight scenario.. pic.twitter.com/G0vpH864Hn
— RVCJ Media (@RVCJ_FB) May 6, 2023
रिपोर्टनुसार, आरसीबी आणि लखनऊमधील मॅचमध्ये मोहम्मद सिराजने नवीन-उल-हकला त्याच्या बाउन्सरने चिडवले होते. कोहलीने आपल्या पत्रात नमूद केले आहे की, त्याने सिराजला फक्त बाउन्सर टाकण्यास सांगितले होते ना की नवीनला इजा पोहोचावी असा हेतू होता.
मात्र, त्याचे वर्तन असे नव्हते की त्याला इतका मोठा दंड ठोठावण्यात आला होता, असे कोहलीला वाटते. कोहलीसाठी या दंडाची रक्कम सुमारे 1.25 कोटी रुपये होती. आता कोहलीला लावण्यात आलेला दंड त्याच्या मानधनातून कापला जाणार की त्याची फ्रेंचायझी आरसीबी ही रक्कम भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर विराटला एक पैसाही मोजावा लागणार नाही, असे समोर आले आहे. मैदानावरील कोणत्याही प्रकारच्या वादासाठी खेळाडूची मॅच फी कापली जात नाही. दंडाच्या बाबतीत, फ्रेंचायझी स्वतः पैसे भरते, अशी बंगळुरू संघाची पॉलिसी आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!