‘कपल’ लोकांसाठी गणपती मंदिर..! ‘हा’ बाप्पा करतो सगळ्या इच्छा पूर्ण; नक्की वाचा!

WhatsApp Group

Ganesh Chaturthi : राजस्थानच्या जोधपूर शहरात असं एक मंदिर आहे जिथं प्रेमाची जत्रा भरते. जिथे प्रत्येक प्रियकराची इच्छा पूर्ण होते. इश्किया गणेश मंदिरात सामान्य गणेश मंदिरांप्रमाणे दररोज पूजा केली जाते आणि मोठ्या संख्येनं भाविक भेट देतात. पण इतर मंदिरांपेक्षा ते अधिक खास आणि लोकप्रिय आहे. वास्तविक येथे येणारे बहुतांश भाविक हे कपल असतात. गणपती येथे येणाऱ्या प्रत्येक प्रियकराच्या मनोकामना पूर्ण करतो असं म्हणतात. येथे येणारा कोणताही भक्त निराश होत नाही, असा समज आहे. यामुळेंच हे मंदिर कपलसाठी खास असून याला ‘इश्किया गणेश मंदिर’ म्हणतात.

इश्किया गणेश मंदिरात पूजा-अर्चा केल्यानं बॅचलर प्रेमींचें नातं लवकर जुळतं, असा समज आहे. त्यांना इच्छित जीवनसाथी मिळतो. वैवाहिक जीवनात प्रेमसंबंध मधुर राहतात. प्रेमी युगुलांव्यतिरिक्त प्रत्येक वयोगटातील इतर भाविक देखील येथे आपल्या इच्छेने येतात आणि गणपतीच्या दरबारात मागण्या मागतात.

हेही वाचा – ज्या ठिकाणी श्रीकृष्णानं प्राण सोडले, तिथं आता काय आहे?

गुरु गणपती ते इश्किया गणेश

जोधपूरमधील इश्किया गणेश मंदिराची स्थापना शंभर वर्षांपूर्वी झाल्याचं स्थानिक लोक सांगतात. शहरातील अरुंद गल्लीतील एका घराबाहेर गुरु गणपती नावाचं हे मंदिर स्थापन करण्यात आले. त्याची बांधणी अशी आहे की इथे उभा असलेला माणूस दुरून सहजासहजी दिसत नाही. त्यामुळंच पहिल्या भेटीसाठी कपल येथे गुपचूप येत असत. हळुहळु हे मंदिर कपल मंडळींची पहिली पसंती बनले.

Ganesh Chaturthi unique Ishqiya Ganesh Temple in Rajasthan for love confessions
इश्किया गणेश मंदिर

 

येथे आल्यावर गजाननाचं दर्शन घेऊन लग्नाची इच्छा व्यक्त केली जाते. लग्न झाल्यानंतर, कपल देवाचे आशीर्वाद स्वीकारून त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी येतात. अशा प्रकारे हे मंदिर गुरु गणपतीपासून इश्किया गणेश मंदिर या नावानं प्रसिद्ध झाले.

बुधवारी काय असतं?

दर बुधवारी या मंदिरात कपल मंडळींची जत्रा भरते. येथे अनेक भाविक विवाहासाठी येतात. लग्नाचे आमंत्रण द्यायला अनेक भक्त येतात आणि अनेक भक्त आभार मानायला येतात. हे मंदिर पहाटे ५ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५:३० ते रात्री ९ या वेळेत उघडते. बुधवारी रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन घेता येते. गणेश चतुर्थीला दिवसभर विशेष पूजा केली जाते.

हेही वाचा – भारतातील एकमेव गाव, जिथं आजही घरोघरी संस्कृत बोललं जातं!

शंभर वर्षे जुनं मंदिर

अरुंद गल्लीच्या टोकाला असलेले हे मंदिर शंभर वर्षांहून अधिक जुनं आहे. महाराज मानसिंग यांच्या काळात गुर का तालबच्या उत्खननात गुरु गणपतीची मूर्ती सापडल्याचं सांगितलं जातं. नंतर ही मूर्ती गुरुंच्या तलावातून टांग्यात प्रस्थापित करून जुनी मंडी येथील निवासस्थानासमोरील व्यासपीठावर आणण्यात आली. अनेक वर्षांपूर्वी प्रेमी युगुलांनी येथे नवस केला होता आणि तो पूर्ण झाल्यानंतर गणपतीचं नाव इश्किया गणेश झाले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment