निवडणुकीनंतर लागू होणार 8वा वेतन आयोग? केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट? जाणून घ्या!

WhatsApp Group

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहे. निवडणुकीनंतर नव्हे तर सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्र याबाबत निर्णय घेऊ शकेल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, दरम्यान, ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशन (एआयआरएफ) या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनेने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, नवे सरकार आल्यानंतर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताकडे लक्ष देत आठव्या वेतन आयोगाचा आढावा घेण्यासाठी तातडीने समिती स्थापन करावी, अशी आमची इच्छा आहे.

सरकारने काय म्हटले आहे?

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारसमोर कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तथापि, मार्च महिन्याच्या सुरुवातीला, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने भारतीय रेल्वे तांत्रिक पर्यवेक्षक संघटनेचे एक पत्र वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाकडे पाठवले आहे. या पत्रात आठवा वेतन आयोग स्थापन करण्याबाबत म्हटले आहे.

हेही वाचा – एप्रिल महिन्यात रेकॉर्ड..! तब्बल 2.10 लाख कोटी जीएसटी कर जमा

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्यासाठी सरकारने फेब्रुवारी 2014 मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन केला होता. यानंतर लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्यासाठी 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या. आता केंद्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्यासाठी 8वा वेतन आयोग स्थापन केला जाणार नाही, असे सरकार म्हणत आहे. मात्र, त्यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी वाढवला जाईल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment