

Atul Subhash Case : अतुल सुभाष आत्म*त्या प्रकरणात अनेक पक्षकार पुढे येत आहेत. अतुल हा एआय इंजिनिअर होता. बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता. 9 डिसेंबर रोजी त्याने 24 पानी चिठ्ठी लिहित आणि 90 मिनिटांचा व्हिडिओ बनवून आत्महत्या केली. अतुल सुभाषने पत्नी निकिता सिंघानियावर हुंडा आणि अनैसर्गिक लैंगिक छळाच्या खोट्या केसेसमध्ये आपल्याला गोवल्याचा आरोप केला.
निकिता सिंघानिया उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तिने अतुल आणि त्याच्या कुटुंबावर एकूण 9 खटले दाखल केले होते. यातील अनेक खटले तिने मागे घेतले. निकिताचे म्हणणे आहे की, तिच्या वकिलाने तिला न सांगता आणि तिची संमती न घेता अतुलविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाशी संबंधित एफआयआर समोर आला आहे.
आत्महत्या से पहले का #AtulSubhash का 63 मिनट का ये पूरा वीडियो सुनकर निःशब्द और विचलित हूं।
— Vinod Kapri (@vinodkapri) December 10, 2024
उफ़ ! #JusticeForAtulSubhash
pic.twitter.com/lFDQZFLEBV
अतुलच्या पत्नीने 24 एप्रिल 2022 रोजी जौनपूर कोतवालीमध्ये हा एफआयआर दाखल केला होता. यामध्ये अतुलसह त्याची आई अंजू देवी, वडील पवन मोदी आणि त्याचा लहान भाऊ विकास मोदी यांनाही आरोपी करण्यात आले आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे, ”26 एप्रिल 2019 रोजी अतुल आणि निकिता सिंघानिया यांचे वाराणसीतील हिंदुस्थान इंटरनॅशनल हॉटेलमध्ये लग्न झाले. लग्नानंतर अतुल सुभाष आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हुंड्यात 10 लाख रुपयांची मागणी सुरू केली. दारू पिऊन नवरा मला मारहाण करायचा. अनैसर्गिक लैंगिक छळ केला. पती अतुल सुभाष निकिताचा पगार त्याच्या खात्यात ट्रान्सफर करायचा. 16 ऑगस्ट 2019 रोजी सासू आणि सासरे निकिताच्या जौनपूर येथील माहेरी गेले आणि 10 लाख रुपये मागितले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी 17 ऑगस्ट 2019 रोजी निकिताच्या वडिलांचा मृत्यू झाला. लोकांच्या सांगण्यावरून पती अतुल सुभाष पत्नी निकितासोबत बंगळुरूला आले. त्याच्यासोबत त्याची आईही होती. 17 मे 2021 रोजी अतुलने निकिता आणि तिच्या आईला मारहाण करून फ्लॅटबाहेर फेकले. पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांना निकिताचे कपडे आणि कागदपत्रे मिळाली, त्यानंतर ती आई आणि मुलासह तिच्या पालकांच्या घरी आली.”
हे सर्व आरोप निकिताने अतुलवर केले होते. पत्नीने स्वत:साठी आणि मुलासाठी दरमहा 2 लाख रुपये भरपाईसाठी गुन्हाही दाखल केला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतुलने या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, तो shaadi.com च्या माध्यमातून निकिताला भेटला होता. लग्नानंतर निकिता फक्त 2 दिवस सासरच्यांकडे राहिली. त्यानंतर ती अतुल सुभाषसोबत बंगळुरूला गेली. निकिता दोन दिवसांतून एक-दोनदा सासरी भेटली. दारूच्या नशेत प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावर अतुल सुभाष म्हणाला त्यांच्यासारख्या मजबूत शरीरयष्टीच्या व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला असता, हाडं तुटली असती, रक्तस्त्राव झाला असता, मारहाणीच्या खुणा झाल्या असत्या, काही व्हिडीओ आला असता. काही फोटो, पण असे काहीही झाले नाही आणि हे घडले तेव्हा पोलिसांना कळवलेही नाही.
हेही वाचा – एका निबंधावरून विद्यार्थ्याचे निलंबन, 5 वर्षांची फेलोशिपही रद्द, नेमके प्रकरण काय?
एफआयआरमध्ये निकिताने तिच्या सासरच्या मंडळींवर 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आणि या धक्क्यामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र अतुलने दावा केला की, तिचे वडील दीर्घकाळ आजारी असून ते हृदयाचे रुग्ण असल्याचे तिच्या पत्नीने न्यायालयात निवेदन दिले होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांना वाराणसी येथील रुग्णालयात नेण्यात आले.
वडिलांच्या निधनानंतर निकिताने पती आणि सासरच्यांविरुद्ध खुनाचा आणखी एक गुन्हा दाखल केल्याचा अतुलचा आरोप होता. व्यवसायात गरज असताना निकिताच्या कुटुंबाला ’15 लाख रुपये’ दिले होते, पण व्यवसायात पैसे गुंतवण्याऐवजी सासरच्यांनी ‘एक कोटींचे घर घेतले’, असे अतुलने सांगितले होते. आणि जेव्हा अतुलने पैसे परत मागितले तेव्हा एप्रिल 2021 मध्ये त्याला फक्त 1.5 लाख रुपये परत देण्यात आले. त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, मी स्वतः 40 लाख रुपयांची नोकरी करतो, अशा स्थितीत 10 लाख रुपये हुंडा का मागणार?
अतुलने लैंगिक छळाचा आरोपही फेटाळून लावला. व्हिडीओमध्ये तो म्हणाला की, केवळ काही बोलण्याने आरोप सिद्ध होत नाहीत. यासाठी पुरावेही असणे आवश्यक आहे.
अतुलच्या म्हणण्यानुसार, तो बंगळुरूचा, त्याचा धाकटा भाऊ दिल्लीचा आणि त्याचे आई-वडील बिहारमधील हुंडा प्रकरणात सुमारे 120 वेळा जौनपूर न्यायालयात हजर झाले. वर्षभरात केवळ 23 सुट्ट्या मिळतात, असे असूनही, तो वैयक्तिकरित्या 40 वेळा न्यायालयात हजर झाला.
अतुलच्या मृत्यूनंतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया, भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर BNS चे कलम 108 (आत्महत्येला प्रवृत्त करणे किंवा भाग पाडणे) आणि 3(5) हे कलम लावण्यात आले आहे. BNS च्या कलम 3(5) अन्वये, प्रत्येक सदस्याला समुहात केलेल्या गुन्ह्यासाठी समान दोषी मानले जाते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!