

Diwali 2022 : दिवाळीचा सण जसजसा जवळ येत आहे, तसतसा सरकारकडून भेटवस्तूंचा पाऊसही पाडला जात आहे. आधी डीए मग बोनस आणि आता सरकार ग्राहकांना स्वस्त धान्य देण्याची तयारी करत आहोत. सणांच्या दिवशी महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने डाळ आणि कांदा किफायतशीर दरात देण्याची घोषणा केली आहे.
दिवाळीत खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे ग्राहक मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. एक मोठे पाऊल उचलत सरकारने राज्यांना अत्यंत कमी दरात डाळ देण्याची घोषणा केली आहे. मंत्रालयाने सांगितले की, केंद्र सरकार राज्यांना केवळ ८ रुपये प्रति किलो दराने डाळ उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून ग्राहकांपर्यंत स्वस्त धान्य पोहोचू शकेल आणि सणांच्या दिवशी बाजारात डाळींची कमतरता भासू नये.
हेही वाचा – ८ पाय, ४ डोळे घेऊन जन्मलं म्हशीचं रेडकू..! अनोखी घटना पाहून सगळे चकित
Government expresses confidence that prices of #pulses and #onion will not go up during current festive season. Consumer Affairs Secretary Rohit Kumar Singh says country has sufficient stock of the two commodities and the center is keeping a close watch on the price situation. pic.twitter.com/0DPul4thXt
— All India Radio News (@airnewsalerts) October 20, 2022
याशिवाय कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठीही सरकार पावले उचलत आहे. ग्राहक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळात बाजारात कांद्याची कमतरता भासू नये याची सरकार काळजी घेईल. त्यासाठी बफर स्टॉकमधून कांदा दिला जाणार आहे.