

Mahaparinirvan Diwas 2022 : बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची आज (६ डिसेंबर) पुण्यतिथी आहे. बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे आधारस्तंभ मानले जाते. समाजात प्रचलित असलेली अस्पृश्यता, दलित, महिला आणि मजूर यांच्यावर होत असलेल्या भेदभावाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि या लढ्याला धार दिली. त्यांचा असा विश्वास होता की मानवी प्रजातींचे ध्येय सतत त्यांची विचारसरणी सुधारणे आहे.
परदेशात अर्थशास्त्राची डॉक्टरेट पदवी मिळवणारे भीमराव हे पहिले भारतीय होते. १९२६ मध्ये ते भारतात आले तेव्हा ते मुंबईच्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. ते स्वतंत्र देशाचे पहिले कायदा मंत्री झाले. १९९० मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात आला. ६ डिसेंबर १९५६ रोजी मधुमेहामुळे त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – Ram Mandir : जय श्रीराम..! राम मंदिराचं बांधकाम कुठपर्यंत आलं? समोर आला पहिला फोटो; तुम्ही पाहिलात?
आंबेडकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे चांगले विचार जाणून घेऊया
- मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून ठरवतो.
- मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव शिकवतो.
- जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने दिलेल्या स्वातंत्र्याला तुमच्यासाठी काही अर्थ नाही.
- महान माणूस एखाद्या प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.
- माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे कल्पना देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेच्या प्रसाराची आवश्यकता असते, जसे एखाद्या वनस्पतीला पाणी लागते, अन्यथा कोमेजून मरतात.
- सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण फक्त एक भारतीय आहोत.
- आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी आपण काय करत आहोत? आपली समाजव्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. जे असमानता, भेदभाव आणि इतर गोष्टींनी भरलेले आहे, जे आपल्या मूलभूत अधिकारांशी संघर्ष करते.
- स्वातंत्र्य म्हणजे धैर्य, आणि धैर्याचा जन्म पक्षातील व्यक्तींच्या संघटनातून होतो.
- शिक्षण जेवढे महिलांसाठी आहे तेवढेच ते पुरुषांसाठीही महत्त्वाचे आहे.
- ज्ञान हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आधार आहे.