

PM Garib Kalyan Yojana : मोदी सरकारने दिवाळीपूर्वी देशातील ८० कोटी जनतेला मोठी भेट दिली आहे. मोफत धान्य योजनेचा कालावधी आणखी तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना यावर्षी डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
वास्तविक, अन्न मंत्रालयाने मोफत अन्नधान्य योजनेसाठी तीन महिन्यांचा कालावधी प्रस्तावित केला होता, त्यावर चर्चा झाली आणि योजनेचा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत देशातील सुमारे ८० कोटी लोकांना तांदूळ किंवा गहू दिला जातो. मात्र, या योजनेमुळे सरकारवर वर्षाला १.४४ लाख कोटी रुपये) चा बोजा आहे. योजनेची व्याप्ती वाढवल्यानंतर त्याचा सरकारवरील एकूण ३.५ लाख कोटी इतका वाढला आहे.
हेही वाचा – आमदार बच्चू कडू गोत्यात..! पोलिसांसमोरच नागरिकाला थोबडावलं; Video व्हायरल
Thanks to hon’ble PM Shri @NarendraModi ji for extending the Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PMGKAY) from October 2022 to December 2022.
The extension will ensure 5kg ration per person, free per month, benefitting over 80 crore people.#HarGharAnn pic.twitter.com/wHX8FyuGDr
— Apurva Singh (@iSinghApurva) September 28, 2022
मोदी सरकारने सणासुदीच्या काळात मोफत अन्नधान्याची व्याप्ती वाढवली आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात ही योजना रद्द केल्याने लोकांना मोठा फटका बसेल, असे अनेक प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आले होते. यासोबतच येत्या काही महिन्यांत गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. विशेष म्हणजे, हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा या वर्षी कमी पावसामुळे भात उत्पादनात ७ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.