मोदी सरकारची ‘मोठी’ घोषणा..! ‘या’ लोकांना सहज मिळणार ५००० रुपये; जाणून घ्या!

WhatsApp Group

Big News For Street Vendors : लोकांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांना अनेक फायदेही देत ​​आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अश्विनी वैष्णव यांनी लोकांना ५००० रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले आहे. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, २०२३ मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्त्यावर विक्रेत्यांना ५००० रुपयांपर्यंतच्या सूक्ष्म कर्जाची सुविधा देण्यावर सरकार विशेष भर देणार आहे.

‘अशा’ लोकांना मिळणार मदत

डिजिटल इंडिया पुरस्कार वितरण समारंभात वैष्णव म्हणाले की, २०२३ मध्ये रस्त्यावर विक्रेत्यांच्या ३००० ते ५००० रुपयांपर्यंतच्या छोट्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोप्या पद्धतीने कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. अश्विनी वैष्णव म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी देशातील सर्व भागात 4G आणि 5G दूरसंचार सेवा देण्यासाठी सुमारे ५२,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा घसरल्या! पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? पाहा यादी

5G तंत्रज्ञान

अश्विनी वैष्णव म्हणाले की, देशात यावर्षी स्वदेशी विकसित 4G आणि 5G तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होताना दिसेल. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीकोनानुसार, देशात लवकरच इलेक्ट्रॉनिक चिप निर्मिती प्रकल्प स्थापन केला जाईल.

नुकसान भरपाई

प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ-रिलेंट फंड (SVANidhi) योजना जून २०२० मध्ये सूक्ष्म-कर्ज सुविधा म्हणून सुरू करण्यात आली होती. कोविड-१९ महामारीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment