BCCI विराटला संघाबाहेर का करू शकत नाही? माँटी पानेसारचं उत्तर ऐकाल तर विचारात पडाल!

WhatsApp Group

मुंबई : यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघात खळबळ उडाली आहे. विषय आहे विराट कोहलीचा फॉर्म. विराट कोहली मागच्या दोन वर्षांपासून कोणालाही स्वप्नात वाटलं नसेल, तसं क्रिकेट खेळतोय. बोलीभाषेत सांगायचं तर जो खेळाडूंना इतरांना संघाबाहेर करायचे निर्णय घ्यायचा, तो आज स्वत: संघातून बाहेर पडायच्या मार्गावर आहे. विराटविषयी क्रीडापंडित मत-मतांतरे देतायत, तर त्याच्यासाठी टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्मा उभा राहिलाय. त्यानं पत्रकार परिषदेत विराटला पाठिंबा दिलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याचे आपण पाहिलं. आता इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पानेसार आपल्या खळबळजनक वक्तव्यामुळं ट्रेंड होतोय. विराटविषयचीचं बोलणं खरंच खरं आहे का? असा प्रश्न पानेसारच्या वक्तव्यामुळं निर्माण झाला आहे.

भारतीय संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळवणं किती कठीण झालंय, हे आपण सर्वजण जाणतो. त्यात झटपट क्रिकेटचे खेळाडू जोरदार तयार होत आहेत. त्यामुळं आऊट ऑफ फॉर्म असणाऱ्या विराटचं काय करायचं असा प्रश्न आणि त्याची चर्चा चघळली जातेय. भारताचा माजी कर्णधार कपिल देवसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना असं वाटतंय की विराटची वेळ संपली आहे, तर अनेकांचं मत आहे की अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विराटला आणखी काही संधी मिळायला हव्यात.

इंग्लंडकडून ५० कसोटी सामने खेळणाऱ्या माँटी पानेसारनं विराट कोहलीची तुलना महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोशी केली. दोन्ही खेळाडूंचे फॅन फॉलोईंग खूप जास्त असल्याचं तो म्हणाला. भारत कोहलीच्या पाठीशी आहे कारण त्याच्या प्रायोजक करारांना (sponsor deal) नुकसान होऊ शकतं.

काय म्हणाला पानेसार?

पानेसार म्हणाला, ”तो ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखा आहे. जेव्हा रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडकडून खेळतो. प्रत्येकजण फुटबॉल पाहतो. विराट कोहलीच्या बाबतीतही तेच आहे. त्याचे फॅन फॉलोईंग देखील खूप आहे, ज्यांना त्याला खेळताना पाहणं आवडतं. बीसीसीआयवरही दबाव आहे का? निकाल काहीही लागो, विराट कोहलीची भूमिका काहीही असो, प्रायोजकांना खूश ठेवायचं? हा बहुधा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे सर्व सोडू शकत नाहीत किंवा सोडण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. ते कदाचित प्रचंड आर्थिक प्रायोजकत्व का गमावतील?”

“विराट कोहली जेव्हा खेळतो तेव्हा स्टेडियम प्रायोजकांनी भरलेलं असतं. आर्थिक दृष्टिकोनातून विराटकडून इतर मंडळांनी खूप काही मिळवलं आहे. पण विराट सध्या भारतासाठी खरंच चांगला आहे का? बीसीसीआयनं निवडकर्त्यांसोबत बसून तोडगा काढायचा का, हा मोठा प्रश्न आहे. कारण जेव्हा टी-२० वर्ल्डकप किंवा वनडे वर्ल्डकप सरख्या मोठ्या स्पर्धांचा विचार केला जातो तेव्हा ते कदाचित जास्त पैसे कमवतात. पण याचा अर्थ त्याच्या खर्चावर वर्ल्डकप जिंकणं नव्हे का? हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंसाठी हे खूप कठीण जाणार आहे”, असंही पानेसारनं सांगितलं.

Leave a comment