PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! ‘या’ तारखेला मिळणार १२व्या हप्त्याचे २००० रुपये

WhatsApp Group

PM Kisan Yojana : केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. या बातमीने शेतकऱ्यांचा सणासुदीचा काळ आणखी आनंददायी होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकार अनेक योजना राबवते. त्यापैकी एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६ हजार रुपये वर्ग करते. ही सरकारची अशी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत ११ हप्त्यांमध्ये पैसे मिळाले आहेत. आता १२व्या हप्त्याचे पैसे १७ ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, सरकार दर ४ महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांसाठी २००० रुपयांचे तीन हप्ते जारी करते. अशाप्रकारे ही रक्कम शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. सध्या बाराव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा – Viral Video : दुसऱ्या बाईसोबत कपडे खरेदी करत होता नवरा, बायकोनं सर्वांसमोरच केली धुलाई!

या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही

पीएम किसान योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांना केंद्राने आधीच सांगितले होते की त्यांच्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांचे बाराव्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात. यावेळी असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना १२ व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. उत्तर प्रदेशातूनच २१ लाख लाभार्थी शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यावर १२ व्या हप्त्याचे २००० रुपये पाठवले जाणार नाहीत.

१२व्या हप्त्याचे पैसे पाठवण्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता तुम्ही किसान पोर्टलवर जाऊन आधार क्रमांकासह तुमची स्थिती तपासू शकत नाही. स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर द्यावा लागेल. पण, त्यानंतर नियम बदलण्यात आले आणि केवळ आधारद्वारे स्थिती तपासण्याची परवानगी देण्यात आली.

Leave a comment