

PM Kisan Yojana : सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये वर्ग केले जातात. तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. असे अनेक शेतकरी पीएम किसान योजनेत सामील झाले आहेत, जे या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करत नाहीत आणि या योजनेचा लाभ घेत आहेत.
अशा अपात्र शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. सरकार आता या अपात्र शेतकऱ्यांकडून पूर्ण पैसे वसूल करत आहे. आता त्यांनाही पीएम किसान योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. चुकीच्या पद्धतीने हप्ते वाढवणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले आहे. 13वा हप्ता जाहीर झाल्यापासून देशभरातील कोट्यवधी शेतकरी 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. भारत सरकार लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करू शकते.
हेही वाचा – Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, तुमच्या शहरात तेल स्वस्त की महाग?
हप्ता परत करावा लागेल
तुमच्या घरातील एकाच जमिनीवर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य PM किसान अंतर्गत हप्ता घेत असतील तर तुम्हाला 2000 रुपये हप्त्याचे पैसे परत करावे लागतील. समजा एखाद्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आणि मुलगा यांना एकाच जमिनीवर पीएम किसानचा हप्ता मिळत असेल तर त्यांना ते पैसे सरकारला परत करावे लागतील. नियमानुसार, पीएम किसान अंतर्गत कुटुंबातील फक्त एका सदस्याला हप्ता मिळू शकतो. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अशा प्रकरणात त्याला तुरुंगातही जावे लागू शकते.