

Telangana Rejects Adani Groups Funding : अमेरिकेतील अदानी समूहावर लाचखोरीच्या आरोपानंतर तेलंगणाच्या काँग्रेस सरकारने कंपनीला 100 कोटी रुपयांचा निधी परत केला आहे. युवकांमध्ये कौशल्य क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने हा निधी घेण्यात आला होता, ज्याला काँग्रेस सरकारने आता नकार दिला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अदानी समूहाकडून कोणतेही पैसे स्वीकारण्यास नकार दिला आहे. यापूर्वी अमेरिकेत उद्योगपती गौतम अदानी आणि इतर सात जणांवर सौरऊर्जेशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. अदानी समूहाने हे आरोप बिनबुडाचे म्हणत फेटाळले आहेत.
यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीसाठी राज्य सरकारने अदानी ग्रुपसह कोणत्याही संस्थेकडून पैसे घेतलेले नाहीत, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “तेलंगणा सरकारने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीसाठी अदानी समुहाकडून कोणताही निधी किंवा देणगी घेतलेली नाही. काल सरकारने अदानी समुहाला पत्र लिहिले की ते कौशल्य विद्यापीठासाठी दिलेले 100 कोटी रुपये स्वीकारणार नाहीत. राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने निविदा मागवाव्यात. अदानी, अंबानी किंवा टाटा असोत, योग्य प्रक्रियेने निविदांचे वाटप लोकशाही पद्धतीने केले जाईल. यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीला अनेक कंपन्यांनी पैसे दिले आहेत. त्याचप्रमाणे अदानी समूहानेही आम्हाला 100 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. मी राज्य सरकारच्या निर्णयाचा पुनरुच्चार करू इच्छितो की ते अदानी समूहाकडून 100 कोटी रुपये स्वीकारणार नाहीत.”
Telangana CM Revanth Reddy says his government has turned down the Rs 100 crore commitment made by @gautam_adani's foundation towards Young India Skills University. "We haven't taken a single rupee from anyone. Yet, to protect Telangana’s dignity & avoid row around my colleagues… pic.twitter.com/a2h7blmITO
— Anusha Ravi Sood (@anusharavi10) November 25, 2024
हेही वाचा – पृथ्वी शॉ आयपीएल 2025 ऑक्शनमध्ये अनसोल्ड!
18 ऑक्टोबर रोजी गौतम अदानी यांनी यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीच्या स्थापनेसाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना 100 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला होता. तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने X वर पोस्ट करून ही माहिती दिली होती. हे वृत्त समोर आल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अदानी प्रकरणात भाजप आणि भारत राष्ट्र समितीने (BRS) काँग्रेसवर ढोंगीपणाचा आरोप केला होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!