

Rice Price : अलीकडच्या काळात तांदळाच्या दरात मोठी वाढ होत आहे. किंमत जवळपास 12 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) सांगितले, की FAO चा एकूण तांदूळ किंमत निर्देशांक जुलै महिन्याच्या तुलनेत 2.8 टक्क्यांनी वाढून सरासरी 129.7 अंकांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा हे जवळपास 20 टक्के अधिक आहे आणि सप्टेंबर 2011 नंतरची तांदळाची सर्वोच्च पातळी आहे.
तांदळाचे भाव का वाढत आहेत?
तांदळाचे भाव वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यापैकी एक म्हणजे तांदळाची जोरदार मागणी. याशिवाय भारताने अलीकडेच बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे दरही वाढले आहेत. भारताच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जागतिक बाजारपेठेत तांदळाचा पुरवठा कमी झाला आहे. यासोबतच, काही तांदूळ उत्पादक देशांतील अनियमित हवामानामुळे कमी उत्पन्न हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे पुरवठा अधिकच कमी झाला आहे.
हेही वाचा – Indian Railways : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी माहिती, ‘या’ गोष्टीत होणार कपात!
तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा
जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा 40 टक्के हिस्सा आहे. देशांतर्गत किमती नियंत्रित ठेवण्यासाठी भारताने गेल्या महिन्यात तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. अलिकडच्या आठवड्यात, किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. भारताच्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणल्याने जागतिक बाजारपेठेत अन्नधान्याच्या किमतीत अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.
अनेक देशांमध्ये संकट
तांदळाच्या वाढत्या किमतीचा अनेक देशांतील अन्नसुरक्षेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. जगभरातील लाखो लोकांसाठी तांदूळ हे मुख्य अन्न आहे आणि जास्त किंमतीमुळे लोकांना हे आवश्यक अन्न परवडणे अधिक कठीण होऊ शकते. अहवालानुसार, भारत, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया आणि पाकिस्तान हे तांदळाचे प्रमुख निर्यातदार आहेत. तर चीन, फिलीपिन्स, बेनिन, सेनेगल, नायजेरिया आणि मलेशिया हे प्रमुख आयातदार आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!