

Tomato Flu in India : कोरोना व्हायरसनंतर टोमॅटो फ्लू (Tomato Flu) या नावाच्या तापानं लोकांचं टेन्शन वाढवलं आहे. टोमॅटो फ्लू सध्या भारतात चर्चेत आहे. आतापर्यंत कोरोनानं आपला जीव सोडला नाही आणि हा नवीन रोग आला कुठून? या फ्लूमुळं अनेकांना संसर्ग झाल्यानंतर केरळमध्ये खळबळ उडाली आहे. टोमॅटो फ्लू म्हणजे नक्की काय प्रकार आहे? त्याची लक्षणं तसेच मृत्यू दर काय आहेत? भारतात त्याचे उपचार काय आहेत आणि ते कसे टाळता येतील? ते जाणून घेऊया. डॉक्टरांचा असा विश्वास आहे, की टोमॅटो फ्लूचा परिणाम पाच वर्षांखालील मुलांवर होत असून आतापर्यंत ८२ रुग्ण टोमॅटो फ्लूचे आढळले आहेत. टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण केरळमधून आला होता. यानंतर या तापाचा धोका वाढत आहे.
टोमॅटो फ्लू म्हणजे काय?
टोमॅटो फ्लूचं प्रकरण समोर आल्यानंतर त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात वाढली आहे. वास्तविक, टोमॅटो फ्लूला वैद्यकीय भाषेत टोमॅटो ताप किंवा हातपाय आणि तोंडाचा एक प्रकारचा आजार म्हणतात. त्याची लक्षणं सहसा हात, पाय आणि तोंडात दिसतात. हातावर पुरळ उठतात. लाल रंगाच्या फोडासारख्या पुरळामुळं त्याला टोमॅटो फ्लू म्हणतात.
I’m always on the lookout for emerging viruses so this stuck out. WTF is “tomato flu”?!
And after looking into it I can confidently say I have absolutely no idea.
This is a great example of how not to report on a novel emerging infectious disease. https://t.co/0rybJStzAy
— Dr. Angela Rasmussen (@angie_rasmussen) August 20, 2022
हेही वाचा – ‘आलं’ फक्त चहात टाकण्यासाठी नसतं; ‘या’ आजारांसाठी ते रामबाण उपाय आहे!
टोमॅटो फ्लू कसा पसरतो?
टोमॅटो फ्लू हा जीवघेणा नसून तो संसर्गजन्य नक्कीच आहे, असं तज्ज्ञांचे मत आहे. डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या दुष्परिणामांमुळं असे आजार होतात, असं काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की मुलांना जास्त धोका असतो, त्यामुळं मुलांना स्वच्छतेच्या गोष्टींपासून दूर ठेवा. मुलाला खाज सुटणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे.
या फ्लूपासून सावध कसं राहायचं?
या आजाराबाबत सांगण्यात आले की हा जीवघेणा नाही. अशा स्थितीत मृत्यू सर सध्या शून्य आहे. मात्र, या आजाराबाबत आरोग्य मंत्रालयाकडून कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. परंतु वेळेवर लक्षणं ओळखून आणि संक्रमित व्यक्तीला वेगळे करून त्यावर सहज नियंत्रण ठेवता येते. त्यामुळं घाबरण्याची गरज नाही. यामध्ये कमी प्रतिकारशक्ती असलेल्या मुलांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.
हेही वाचा – गूगल पे, फोन पे म्हणजे UPI साठी शुल्क लागणार? वाचा काय खरं नी काय खोटं!
भारतात परिस्थिती काय?
लॅन्सेटच्या अहवालानुसार मे महिन्यात केरळमधून या फ्लूचा उद्रेक झाला होता. केरळमध्ये या आजाराच्या प्रादुर्भावामुळे तमिळनाडू आणि कर्नाटकमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्याच वेळी, भुवनेश्वर, ओडिशातील प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रात २६ मुलांना याची लागण झाल्याची नोंद झाली आहे. केरळ, तामिळनाडू आणि ओडिशा सोडलं, तर देशातील इतर कुठल्याही राज्यात हा ताप आढळलेला नाही ही दिलासादायक बाब आहे.