

Maharashtra Kisan Yojana : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारची योजना असलेली पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री किसान योजनेची शिंदेंनी घोषणा केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही मोठी गोष्ट आहे. राज्यात लवकरच ही योजना लागू केली जाईल. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळतील. या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. शिवाय अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठीचा वाढीव निधी जिल्ह्यांना सुपूर्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान किसान योजना
कृषी विभागासह तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाश शिंदेंची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मान्यता दिलीय. योजना पूर्णत्वाला नेण्याचं काम विभाग पातळीवर सुरू आहे. येत्या आर्थिक वर्षात बजेटमध्ये ही तरतूद केली जाणार आहे. २०१८ मध्ये पंतप्रधान किसान योजनेची सुरुवात झाली होती. या योजनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पैसे मिळतात. या रक्कमेचं वाटपं तीन हफ्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये यानुसार केलं जातं.
हेही वाचा – बाप्पा पावला..! औरंगाबादची बेपत्ता युट्यूबर बिंदास काव्या ‘या’ राज्यात सापडली; पाहा VIDEO
किती मिळणार मदत?
यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिकांचं आणि शेतजमिनीचं भरपू नुकसान झालं. तब्बल २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. अतिवृष्टीग्रस्तांना या नुकसानासंदर्भात वाढीव मदत केली जाईल, अशी कल्पना दिली होती. कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही, असं शिंदेनी म्हटलं होतं. या वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी १३,६०० प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीनं जमा करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.