

Bandra Worli Sea Link Accident : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. येथे चार कार आणि एका रुग्णवाहिकेची धडक झाली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की पाचही गाड्यांचा चक्काचूर झाला.
कसा घडला अपघात?
वांद्रे वरळी सी-लिंकवर प्रथम एका गाडीचा अपघात झाला. त्यानंतर जखमींना उचलण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली. मात्र त्यापूर्वीच आणखी ३ वाहने जखमींना घेऊन जाणारी रुग्णवाहिका आणि आधीच अपघात झालेल्या कारला धडकली. यानंतर सी लिंकवर गदारोळ झाला. त्याचवेळी माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा – Video : किती तो साधेपणा..! सोनू सूदचा लोकल ट्रेननं प्रवास; स्टेशनच्या नळाचं पाणी पित म्हणाला…
Maharashtra | 10 people got injured in a collision between four cars and an ambulance on Mumbai's Bandra Worli Sea Link pic.twitter.com/7ihc7xnZv5
— ANI (@ANI) October 5, 2022
#BREAKING : 5 people died in the #accident that took place between four cars and an ambulance on #Mumbai's Bandra #Worli Sea Link in the early morning hours today.#Maharashtra #India #CCTV#SeaLink #SeaLinkAccident #BandraWorliSeaLink #caraccident #incidents #accidents pic.twitter.com/kSTJQTQgdG
— Top Disaster (@Top_Disaster) October 5, 2022
Bandra-Worli Sea link accident..@RoadsOfMumbai @mumbaitraffic pic.twitter.com/VBwoL76je2
— Vivek Gupta (@imvivekgupta) October 5, 2022
त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्या ४ ते ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आता पुढील तपास सुरू केला आहे.