

Kolhapur Crime : व्हॉटस्ॲप स्टेटसवर मेसेज ठेऊन तरुणानं तरुणीसह स्वत:चा संपवल्याची घटना कोल्हापूरात घडली आहे. जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील या घटनेनं सगळेच हादरले आहेत. गिरोली घाट येथील पांडवलेणी परिसरात एका गाडीतून नेत तरुणानं तरुणीचा नॉयलान दोरीनं गळा आवळला आणि डोक्यात वार करून खून केला. तरुणीला संपवल्यानंतर या तरुणानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) असं तरुणीचं तर कैलास आनंदा पाटील (वय २६, रा. लिंगनूर, ता. कागल) असं तरुणाचं नाव आहे. लग्नाला विरोध केल्याने कैलासनं टोकाचं पाऊल उचललं. दोघेही नातेवाईक असल्यानं त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. पण कैलास बेरोजगार होता, त्यामुळे लग्नाला विरोध होत होता.
हेही वाचा – वKFC चिकन सँडविचच्या पॅकेटमध्ये सापडले ४३,००० रुपये..! मग तिनं काय केलं? नक्की वाचा!
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खुनानंतर कैलासनं व्हॉटस्ॲप् स्टेटसवर ”मला माफ करा, मी जात आहे, गुडबाय लाईफ,” असा मेसेज टाकला. नातेवाईकांच्या ग्रुपवरही त्यानं हाच मेसेज टाकला. कैलासच्या वडिलांना हा मेसेज मिळाल्यानंतर त्यांनी वडगाव पोलीस ठाण्यात कळवलं. खूनाची बातमी समजल्यानंतर ऋतुजाचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळं दोघांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे.