

Maharashtra Weather Update : देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. काही ठिकाणी तापमानात घट झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० मार्चपर्यंत अनेक भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे.
महाराष्ट्रात या भागात पावसाची शक्यता
गुरुवार, १६ मार्च ते १८ मार्च या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवस ढगांच्या गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. १६ आणि १७ मार्चला तीन दिवस विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १६ मार्चपर्यंत मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे.
येथेही पावसाची शक्यता
१६ मार्चपर्यंत उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यलो अलर्टमध्ये हवामान खात्याने हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हेही वाचा – IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सला मिळाला ‘नवा’ कॅप्टन..! सौरव गांगुलीकडे ‘मोठी’ जबाबदारी; वाचा!
१६ ते २० मार्च दरम्यान, पुढील पाच दिवस पूर्व भारत, उत्तर-पश्चिम भारत तसेच पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस, गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, पुढील १० दिवसांत मध्य, उत्तर आणि पश्चिम भागात मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादनांवरही परिणाम होणार आहे.
या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे. १६ ते १९ मार्च दरम्यान विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अनेक ठिकाणी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, हयाणा, दिल्ली आणि डोंगराळ भागांसह अनेक भागांसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
डोंगराळ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस
तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेशमध्ये १६ ते १९ मार्चदरम्यान पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, १७ ते १९ मार्च दरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाचा शेतीवर परिणाम
हवामानात सतत बदल होत असतात. जिथे दुपारी सूर्यप्रकाश असतो तिथे ढग असतात. याचा परिणाम पिकांवर होत आहे. अनेक राज्यांत पिकांची नासाडी झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सध्या शेतीतील पिकांची काढणी सुरू आहे. तसेच पाऊस किंवा गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!