

Manikrao Kokate Rummy Row : महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्याकडे आता खेळ व युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे. त्यांच्या जागी दत्तात्रेय भरणे यांना नव्या कृषी मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही NCP (अजित पवार गट) चे नेते आहेत.
‘जंगली रम्मी’ खेळणं ठरलं महागात!
या बदलामागील कारण म्हणजे कोकाटेंचा व्हायरल झालेला एक मोबाईल गेम खेळण्याचा व्हिडीओ. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनादरम्यान कोकाटे मोबाईलवर ‘जंगली रम्मी’ हा ऑनलाइन गेम खेळताना दिसले. NCP (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कोकाटेंवर जोरदार टीका केली होती.
Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate's video of him playing Junglee Rummy, an online card game, on his phone in the Legislative Assembly proves how the BJP led state government is 'Gambling' with the lives of farmers.
— Clyde Crasto (@Clyde_Crasto) July 20, 2025
Farmers are committing suicide due to lack of… pic.twitter.com/9WZpwtvSsG
विरोधकांनी असा सवाल केला होता की, “राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना कृषी मंत्री ऑनलाईन गेम खेळत आहेत?” ही गोष्ट सरकारसाठी लाजीरवाणी आहे.
हेही वाचा – दिल्लीतून पळून सलमान खानला भेटायला निघाली 3 पोरं, चिठ्ठी लिहून घर सोडलं, मग…
कोकाटेंचे स्पष्टीकरण आणि चौकशी
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटेंनी सफाई दिली की ते गेम खेळत नव्हते, फक्त पॉप-अप बंद करत होते. त्यांनी कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र, विधानसभा सचिवालयाच्या आंतरिक चौकशीत स्पष्ट झाले की कोकाटे प्रत्यक्षात रम्मी गेम खेळत होते.
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली आणि नंतरच कोकाटेंची खात्यांमध्ये अदलाबदल झाली. आता कोकाटे यांच्याकडे खेळ मंत्रालय असून दत्तात्रेय भरणे कृषी मंत्रालयाचे नवीन मंत्री असतील.
कोकाटेंचा वादग्रस्त इतिहास
हे पहिलेच प्रकरण नाही. याआधी कोकाटेंनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती. तसेच, त्यांना 1995 मधील एक निवासी घोटाळा प्रकरणात शिक्षा झाली होती, जरी नंतर कोर्टाकडून त्यांना सशर्त दिलासा मिळाला होता.
सरकारचा डॅमेज कंट्रोल?
या बदलाकडे सरकारची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. एनडीएतील दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच वादग्रस्त मंत्र्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यामुळेच सरकारला दबावाखाली हा निर्णय घ्यावा लागला, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!