

Nilesh Rane On Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या युद्धादरम्यान उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह देण्यात आले आहे. त्याचवेळी त्यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या तीन पर्याय मागितले असून, त्या आधारे त्यांना निवडणूक चिन्हही दिले जाणार आहे. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले आहे.
ठाकरे गटाला नवे चिन्ह आणि नवे नाव मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी दोन ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली. पहिल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, ”भंगार उद्धव ठाकरे म्हणे रडला… चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे रडला. अरे हे पक्ष आणि हे सगळं बाळासाहेबांचं होतं, गेलं म्हणून रडायचं नाटक करू नको, तुझ्यामुळेच गेलं. ज्या दिवशी स्वतःचं कमावशील तेव्हा ही सगळी नाटकं कर, स्वतःच्या जीवावर एक केळ्याची गाडी टाकून दाखव.”
भंगार उद्धव ठाकरे म्हणे रडला… चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे रडला. अरे हे पक्ष आणि हे सगळं बाळासाहेबांचं होतं, गेलं म्हणून रडायचं नाटक करू नको, तुझ्यामुळेच गेलं. ज्या दिवशी स्वतःचं कमावशील तेव्हा ही सगळी नाटकं कर, स्वतःच्या जीवावर एक केळ्याची गाडी टाकून दाखव.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 10, 2022
हेही वाचा – मोठी बातमी…! धनंजय चंद्रचूड होणार भारताचे ५०वे सरन्यायाधीश; वाचा त्यांच्याबद्दल…
दुसऱ्या ट्वीटमध्ये राणे म्हणाले, ”अंधेरी पूर्व ची जागा महाविकास आघाडी म्हणून पोटनिवडणूक लढणार असं काँग्रेसने जाहीर केले. उद्धवला काँग्रेसच्या कुबड्यांशिवाय चालतच नाही, मधला काळ जेव्हा उद्धव खाजवू शकत नव्हता तेव्हा काँग्रेसच्या काही लोकांना विनंती करून ‘मला खाजवून द्या’ सांगून खाजवून देखील घेतलं असेल.”
अंधेरी पूर्व ची जागा महाविकास आघाडी म्हणून पोटनिवडणूक लढणार असं काँग्रेसने जाहीर केले. उद्धवला काँग्रेसच्या कुबड्यांशिवाय चालतच नाही, मधला काळ जेव्हा उद्धव खाजवू शकत नव्हता तेव्हा काँग्रेसच्या काही लोकांना विनंती करून 'मला खाजवून द्या' सांगून खाजवून देखील घेतलं असेल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 10, 2022
आता या ट्वीटनंतर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, ते पाहावे लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केवळ मुद्दे वेगळे राहिले असले तरी उद्धव विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई तीव्र होत आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यावर सत्ताबदलाची सुरुवात झाली, मात्र त्यानंतर शिवसेनेचे वर्चस्व वाचवण्याच्या लढाईने तणाव कमी करण्याची संधी दिली नाही. आता या सगळ्यावर निवडणूक चिन्हाच्या लढतीने वादात आणखी भर पडली आहे.