

Sunil Gavaskar on Sri Lanka : आशिया चषक २०२२ च्या मोसमात चाहते आणि दिग्गज क्रिकेटपटू श्रीलंका संघाकडे दुर्लक्ष करत होते. श्रीलंकेकडं फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल होईल असं लोक म्हणत होते. पण श्रीलंकेनं विजेतेपद मिळवून या लोकांना चपराक दिली आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
गावसकर म्हणाले, ”आशिया कपमध्ये लोक फक्त भारत आणि पाकिस्तान संघाबद्दल बोलत होते. हे दोन्ही संघ खेळत असल्याचं दिसत होतं. पण श्रीलंकेच्या खेळाडूंनीही आपली उपस्थिती नोंदवून त्या लोकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान, भारत-पाकिस्तान आणि भारत-पाकिस्तान यावरच सगळेच बोलत होते. जसे की येथे फक्त दोन संघ आहेत. श्रीलंकेनं सहाव्यांदा आशिया चषक जिंकला, जो भारतीय संघानंतरचा दुसरा संघ आहे. या श्रीलंकेने त्या लोकांना कानाखाली वाजवली आहे जे म्हणत होते की अंतिम सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये होईल.”
C H A M P I O N S !
Men's Asia Cup Champions for the 6️⃣th time! 🏆#RoaringForGlory #SLvPAK pic.twitter.com/t3RmkBan4t
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 11, 2022
हेही वाचा – मोठी बातमी..! टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; वाचा कोण आहेत ते १५ खेळाडू!
‘विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करणं हे उद्दिष्ट नाही’
पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाबाबत गावसकर म्हणाले, ”भारतीय संघाचा उद्देश पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकणं नसून विजेतेपद मिळवणं हा असला पाहिजे. हे देखील खरं आहे की पाकिस्तानला पराभूत करणं देखील चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळेल, जो इतर संघांविरुद्ध उपयोगी पडेल. पण माझा विश्वास आहे की तुम्हाला ५ पैकी किमान ४ सामने जिंकावे लागतील, तरच तुम्ही बाद फेरीसाठी पात्र ठरू शकाल.”
🏆 ✨
Sri Lanka team celebrating their #AsiaCup2022 triumph with the fans in Colombo 🤩 pic.twitter.com/yRTzcr9PzR
— ICC (@ICC) September 13, 2022
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. याची सुरुवात १६ ऑक्टोबरला होणार असून अंतिम सामना १३ नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (१२ सप्टेंबर) विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली.
हेही वाचा – रजनीकांत पुन्हा झाले आजोबा..! घरी आला ‘गोंडस’ पाहुणा; पाहा PHOTO
टी-२० वर्ल्डकप २०२२ साठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उपकप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू – श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर, मोहम्मद शमी.