

Gautam Gambhir On Worshipping Indian Cricketers : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटमधील ‘हीरो पूजे’वर टीका केली आहे. गंभीरचा असा विश्वास आहे, की ही संस्कृती १९८३ पासूनची आहे, जेव्हा भारतानं पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. गंभीरच्या म्हणण्यानुसार, चाहत्यांनी विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव यांसारख्या स्टार्सचा इतका सन्मान केला आहे, की ते इतर टीम सदस्यांचं योगदान विसरले आहेत.
गंभीर म्हणाला, ‘‘खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये इतकं मोठं करू नका. भारतीय क्रिकेट हे सर्वात मोठे असले पाहिजे, वैयक्तिक नाही. तुम्हाला असं वाटतं का की ही संपूर्ण ‘हिरो पूजा’ पुढचा स्टार येण्यासाठी दडपून टाकते? त्या सावलीत कोणीही पुढं सरकत नाही. आधी महेंद्रसिंग धोनी होता आणि आता विराट कोहली आहे.”
हेही वाचा – केरळच्या रिक्षावाल्याला २५ कोटींची लॉटरी..! जिंकलेल्या पैशातून पहिली ‘ही’ गोष्ट करणार
विराट कोहलीचं ७१वं शतक संपूर्ण देशानं साजरं केलं. विराटनं या सामन्यात १२२ धावा करून १०२१ दिवसांचा शतकाचा दुष्काळ संपवला. नोव्हेंबर २०१९ नंतरचं हे त्याचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिलं शतक होतं. मात्र, गंभीरला चिंतेची बाब म्हणजे कोहलीनं सामन्यात अर्थपूर्ण योगदान दिलं. पण भारताच्या विजयासाठी, भुवनेश्वर कुमारनं या सामन्यात तितकीच अविश्वसनीय कामगिरी केली होती, ज्याची फारशी चर्चा झाली नव्हती.
“It started in 1983. When India won the first World Cup, it was all about Kapil Dev. When we won in 2007 and 2011, it was Dhoni,” @GautamGambhir said.https://t.co/IgikpqGp6d
— Circle of Cricket (@circleofcricket) September 19, 2022
गंभीर म्हणाला, “जेव्हा कोहलीनं १०० धावा केल्या, तेव्हाच मेरठमधील एका छोट्या शहरातील हा खेळाडू (भुवनेश्वर कुमार) पाच विकेट घेण्यास यशस्वी झाला, तेव्हा कोणीही त्याच्याबद्दल बोलण्याची तसदी घेतली नाही. हे अत्यंत दुर्दैवी होतं. त्या समालोचन कार्यकाळात मी एकटाच भुवनेश्वरबद्दल बोलत होतो. त्यानं चार षटकं टाकली आणि पाच बळी घेतले. भारताला अशा प्रकारच्या हीरोंच्या पूजेतून बाहेर पडण्याची गरज आहे. भारतीय क्रिकेट असो, राजकारण असो, दिल्ली क्रिकेट असो. हीरोंची पूजा करणं बंद केलं पाहिजे.”