कार्तिक तुफान फॉर्ममध्ये असतानाही धोनीनं ‘ती’ चाल खेळली आणि रोहित शर्मा ओपनर बनला!

WhatsApp Group

मुंबई : जोपर्यंत केएल राहुल त्याच्या दुखापतीतून बरा होत नाही तोपर्यंत टीम इंडियाचं मॅनेजमेंट ओपनर बॅट्समनसाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहे. ऋषभ पंतला अलीकडंच इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात डावाची सुरुवात करण्यास सांगण्यात आलं होतं. त्याचवेळी सूर्यकुमार यादवनं वेस्ट इंडिजविरुद्ध ओपनिंगला येत डावाची सुरुवात केली. दरम्यान भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं रोहित शर्माला डावाची सुरुवात करण्याचा निर्णय कसा घेतला होता, याची आठवण करून दिली.

रोहित शर्माला धोनीनं ओपनर बनवलं होतं, ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे, पण या कथेत एक मजेदार ट्विस्टही आहे. दिनेश कार्तिकमुळं रोहितच्या फलंदाजीचा क्रम कसा बदलला आणि हा सट्टा टीम इंडियासाठी सुपरहिट ठरला. खरं तर, चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३च्या आधी झालेल्या सराव सामन्यात दिनेश कार्तिकनं ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध १४६ धावा केल्या होत्या, त्यामुळं धोनीला एक शुद्ध फलंदाज म्हणून संघात कायम ठेवायचं होतं. दिनेश कार्तिकला मधल्या फळीत ठेवण्यासाठी धोनीने रोहितकडून डावाची सुरुवात केली होती आणि हा सट्टा भारतासाठी आतापर्यंत सुपरहिट ठरला आहे.

हेही वाचा – अजबच..! गेल्या २२ वर्षांपासून ‘या’ माणसानं अंघोळच केलेली नाही; कारण ऐकाल तर…!

धोनीची अद्भुत चाल!

क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना श्रीधर म्हणाले, की दिनेश कार्तिक नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत असताना धोनीनं रोहितला डावाची सुरुवात करण्यास सांगितलं. हे धोनीचं पाऊल होतं, ज्यानं भारतीय क्रिकेटसाठी चांगलं काम केलं. श्रीधर म्हणाले, “२०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ओपनिंगसाठी रोहितला पाठवण्याचा निर्णय धोनीनं घेतला होता. सराव सामन्यांमध्ये दिनेश (कार्तिक) चांगली फलंदाजी करत होता, पण रोहित खेळणार होता. त्यामुळं तत्कालीन मॅनेजमेंट आणि कर्णधार धोनी यांनी रोहितचं वरच्या क्रमवारीत स्थान निर्माण केलं. ही एक अद्भुत चाल होती.”

रोहितनंही धोनीचा विश्वास खरा ठरवला, त्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवनसोबत डावाची सलामी दिली आणि टीम इंडियानं त्याच वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावलं. रोहितनं नुकतीच सूर्यकुमार यादवसोबत डावाची सुरुवात केली आहे. पांढऱ्या चेंडूनं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव हा भारताचा अव्वल फलंदाज म्हणून उदयास आला आहे. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली. तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यानं विंडीजविरुद्ध मॅच-विनिंग इनिंग खेळली. त्यानं ४४ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ७८ धावा केल्या.

हेही वाचा – कळलं का..? ‘यंग’ आहात म्हणून काय झालं, ब्लड प्रेशर वयानुसार ‘एवढं’ असावं!

श्रीधर पुढे म्हणाले, “सूर्यकुमार यादवनं सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे, तर विराट कोहली ब्रेकमधून परत येईपर्यंत श्रेयस अय्यरलाही तिसऱ्या क्रमांकावर येण्याची खात्री आहे. आम्ही टी-२०मध्ये जे पाऊल उचलले ते म्हणजे सुर्या काही वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध संघात आला. तो किती चांगला आहे हे त्यानं दाखवून दिलं. श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर आला, जिथं विराट कोहली खेळतो.”

विराट कोहली गेल्या काही काळापासून आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. त्याला वेस्ट इंडिज तसेच झिम्बाब्वे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. आशिया कप २०२२ मध्ये विराट पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment