

T20 World Cup 2022 IND vs ENG Rohit Sharma : टी-२० विश्वचषक २०२२ चा दुसरा उपांत्य सामना आज गुरुवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना अॅडलेड ओव्हरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता ही लढत सुरू होईल. या सामन्यातील विजयी संघ १३ नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. वास्तविक, पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडला पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.
‘या फॉरमॅटनुसार खेळावे लागेल’
त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्मा म्हणाला, ”आम्हाला माहीत आहे की टी-२० क्रिकेट कसे खेळले जाते. या फॉरमॅटमध्ये तुम्ही सामन्याच्या दिवशी कसे खेळता हे खूप महत्त्वाचे आहे. या फॉरमॅटमध्ये सामने जिंकण्यासाठी तुम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागेल. तुम्ही तसे करण्यात अयशस्वी झाल्यास निकाल तुमच्या विरोधात जाऊ शकतो.”
𝗧𝗵𝗲 𝗠𝗮𝘁𝗰𝗵-𝗗𝗮𝘆 𝗜𝘀 𝗨𝗽𝗼𝗻 𝗨𝘀! 👌 👌#TeamIndia geared up for the #T20WorldCup semi-final clash against England 👍 👍#INDvENG pic.twitter.com/PXZV2AY6wQ
— BCCI (@BCCI) November 10, 2022
हेही वाचा – “मुंबई-बर्मिंगहम विमानसेवेसाठी राज्य सरकार…”, CM एकनाथ शिंदेंची ग्वाही!
🗣️🗣️ #TeamIndia captain @ImRo45 ahead of the semifinal clash in the #T20WorldCup against England. #INDvENG pic.twitter.com/GLRCWAvO5f
— BCCI (@BCCI) November 9, 2022
रोहित शर्मा म्हणाला, ”इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याआधी आमचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे, आमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नाही, पण यासारख्या संघाविरुद्ध मैदानावर आम्हाला आमचे शंभर टक्के द्यावे लागतील यात शंका नाही. इंग्लंड.. मला खात्री आहे की आमची टीम हे करू शकेल. आम्ही इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.”