SL vs PAK : पराभव बोचला..! PCB अध्यक्षांनी भारतीय पत्रकाराचा फोन हिसकावला; म्हणाले, “तुम्ही तर…”

WhatsApp Group

Rameez Raja Snatched Mobile Of Indian Journalist : आशिया कप २०२२ स्पर्धेमध्ये (Asia Cup 2022) श्रीलंका आणि पाकिस्तान (SL vs PAK) यांच्यातील अंतिम सामन्यात श्रीलंकेनं २३ धावांनी विजय मिळवला आणि सहाव्यांदा आशिया चषक जिंकला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांना हा पराभव जिव्हारी लागला. पत्रकारांची उत्तरं देताना भारतीय पत्रकारासोबतही त्यांनी चुकीचं वर्तन केलं.

हिसकावला फोन

आशिया चषक २०२२ च्या फायनलनंतर जेव्हा भारतीय पत्रकारानं रमीझ राजांना विचारलं, की “पाकिस्तानचे लोक पराभवाने दु:खी आहेत का, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल?” या प्रश्नावर रमीझ म्हणाले, “तुम्ही भारतीय आहात? तुम्हाला खूप आनंद होईल ना..?” इतकंच नाही तर रमीझ राजा काही पावलं पुढे गेले आणि त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतल्याचं दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – SL Vs PAK : आशिया कप फायनलमधून भारतीय चाहत्यांना स्टेडियमबाहेर काढलं? पाहा VIDEO

असा रंगला सामना…

नाणेफेक गमावूनही श्रीलंकेनं हा सामना जिंकला. बहुतेक सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ जिंकतो असं सर्वसाधारणपणे दिसून येते पण या अंतिम सामन्यात थोडं उलटं झालं. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने १७६ धावा केल्या. श्रीलंकेसाठी भानुका राजपक्षेनं ४५ चेंडूत ७१ धावांचं योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव १४७ धावांवर आटोपला. मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक ५५ धावा केल्या.

हेही वाचा – रत्नागिरीत दोन एसटी बस समोरासमोर जोरात धडकल्या..! शाळकरी मुलांसह प्रवासी जखमी

बाबर आझम पुन्हा अपयशी

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यानं पुन्हा एकदा पाकिस्तानी चाहत्यांना नाराज केले आहे. पहिल्या काही सामन्यात धावा न केल्यावर अंतिम सामन्यात त्याची बॅट नक्कीच खेळेल अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही. बाबर आझमनं ६ चेंडूत ५ धावा केल्या आणि त्याला दिलशान मधुशंकाने झेलबाद केलं. बाबरचा फॉर्म नसणं हा टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघासाठी धक्कादायक प्रकार ठरू शकतो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment