

Shoaib Akhtar After PAK vs ZIM Match : पर्थच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्याने त्यांचे चाहते संतापले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही त्यांच्या संघावर नाराज आहेत. माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टी-२० वर्ल्डमध्ये पर्थमध्ये एका धावेने झालेल्या पराभवावर बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच अख्तरने दावा केला, की पाकिस्तान या आठवड्यात घरी येईल, आणि टीम इंडिया सेमीफायनल खेळून पुढच्या आठवड्यात घरी येईल. भारत काही तीस मार खान नाही.
शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “मला माहीत नाही की तुम्हाला समजणे इतके अवघड का आहे. मी हे याआधीही सांगितले आहे आणि मी पुन्हा सांगत आहे की आमच्या वरच्या आणि मधल्या फळीमुळे आम्ही मोठे यश मिळवू शकतो, परंतु आम्ही सातत्यपूर्ण विजय मिळवू शकत नाही. नवाजने तीन सामन्यांमध्ये शेवटचे षटक टाकले आहेत. पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर आहे.
Elite Commentary off the final ball by @mmbangwa #PAKvsZIM pic.twitter.com/mobEGCY6X2
— Mark Howard (@MarkHoward03) October 27, 2022
हेही वाचा – PAK Vs ZIM : कडक..! झिम्बाब्वेविरुद्ध बाबर आझमनं घेतला ‘कॅच ऑफ द टुर्नामेंट’; पाहा Video
पाकिस्तानचा सामना रविवारी नेदरलँड्सशी होणार आहे. जर पाकिस्तान नेदरलँड्सविरुद्ध हरला तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर होतील. याआधी त्यांना सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला होता, तर झिम्बाब्वेने पाकिस्तानचा १ धावांनी पराभव केला होता.