

Team India For T20 World Cup 2022 : यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. टीम इंडियाला गेल्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर नुकत्याच झालेल्या आशिया कप २०२२ मध्ये टीम इंडियानं निराशाजनक कामगिरी केली होती. या सगळ्यामध्ये टीम इंडियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसन आणि मोहम्मद शमीला संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र तसं झाले नाही. जवळपास त्याच खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यांच्या नावाचा अंदाज आधीच लावला जात होता.
कधीपासून सुरू होतोय टी-२० वर्ल्डकप?
टी-२० वर्ल्डकप २२ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ २३ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. हा सामना मेलबर्न येथे होणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, तेव्हाचे ते भारतीय संघाचे आयसीसीचे शेवटचे विजेतेपद होते. त्यानंतर धोनीचं युग संपलं. विराट कोहलीचं कर्णधारपदही गेलं. आता रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करतोय. अशा स्थितीत संपूर्ण देशाच्या नजरा आता रोहित आणि त्याच्या निवडलेल्या संघावर लागून राहिल्या आहेत. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे आशिया कपमध्ये खेळले नाहीत. पण आता ते तंदुरुस्त होऊन संघात परतले आहेत.
हेही वाचा – रोमँटिक झालं जी..! रणजी खेळणाऱ्यानं टीम इंडियाच्या क्रिकेटरला केलं प्रपोज; पाहा PHOTO
टी-२० वर्ल्डकप २०२२ साठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उपकप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
One title 🏆
One goal 🎯
Our squad 💪🏻#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/Dw9fWinHYQ— BCCI (@BCCI) September 12, 2022
स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
हेही वाचा – रजनीकांत पुन्हा झाले आजोबा..! घरी आला ‘गोंडस’ पाहुणा; पाहा PHOTO
भारताला २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०मालिका खेळायची आहे. पहिला सामना मोहालीत तर दुसरा सामना नागपुरात २३ सप्टेंबरला होणार आहे. तिसरा सामना २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०मालिकाही खेळणार आहे, जी २८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना तिरुअनंतपुरममध्ये तर दुसरा सामना गुवाहाटीमध्ये २ ऑक्टोबरला होणार आहे. तिसरा सामना ४ ऑक्टोबरला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२०मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उपकप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार , मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.
🚨 NEWS 🚨: India’s squads for ICC Men’s T20 World Cup 2022, Australia & South Africa T20Is announced. #TeamIndia | #T20WorldCup | #INDvAUS | #iNDvSA
More Details 🔽https://t.co/ZFaOXlmduN
— BCCI (@BCCI) September 12, 2022
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-२०मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उपकप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.