“सर, आम्ही वर्ल्डकप जिंकून येऊ”, जेव्हा धोनीचा आत्मविश्वास पाहून हादरले होते सिलेक्टर्स!

WhatsApp Group

T20 WC 2007 : महेंद्रसिह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. २००४ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणारा धोनी तीन वर्षांतच भारतीय संघाचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ ते २०१३ दरम्यान तीन आयसीसी विजेतेपदे जिंकली. धोनीने टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा टीममध्ये एकापेक्षा एक मजबूत खेळाडू उपस्थित होते. टी-२० विश्वचषक २००७ च्या काही दिवस आधी त्याला भारताचे कर्णधारपद मिळाले.

क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये सीनियर्सऐवजी युवा खेळाडूंना संधी द्यावी, अशी निवड समितीची इच्छा होती. सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दिग्गज खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला नव्हता.

हेही वाचा – रॉजर फेडररसाठी नदाल रडला..! विराट कोहली म्हणतो, “हा माझ्यासाठी आत्तापर्यंतचा…”

“सर, आम्ही वर्ल्डकप जिंकून येऊ”

महेंद्रसिंह धोनीशिवाय वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि युवराज सिंग हेही त्यावेळी संघात कर्णधारपदाचे दावेदार होते. मात्र, भारतीय निवड समितीने धोनीवर विश्वास व्यक्त केला. बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे हेही त्यावेळी निवड समितीचा भाग होते. धोनीला कर्णधार बनवल्याबद्दल जगदाळे एका मुलाखतीत म्हणाले होते, “धोनीचा आत्मविश्वास सुरुवातीपासूनच मजबूत होता.” जगदाळे यांनी टी-२० विश्वचषकापूर्वी धोनीशी संघाबाबत चर्चा केली होती. तेव्हा जगदाळे यांनी धोनीला सांगितले, ”हा चांगला संघ आहे.” यावर धोनी त्याला म्हणाला, “सर, आम्ही वर्ल्डकप जिंकून येऊ”. धोनीचा आत्मविश्वास पाहून आश्चर्यचकित झाल्याचं जगदाळे सांगतात.

हेही वाचा – खुशखबर..! देशात १ ऑक्टोबरपासून सुरू होतंय 5G; होणार ‘असा’ फायदा!

संजय जगदाळे, दिलीप वेंगसरकर, व्यंकटपती राजू, रंजीब बिस्वाल आणि भूपिंदर सिंग यांचा समावेश असलेल्या निवड समितीने २००७ च्या टी-२० विश्वचषकासाठी धोनीची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. महेंद्रसिंह धोनीला कर्णधार म्हणून पहिला सामना स्कॉटलंडविरुद्ध खेळावा लागला होता. मात्र, पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment