

Arshdeep Singh : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-20 युजवेंद्र चहलचा विक्रम मोडला. आता अर्शदीप सिंग भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप येताच त्याने दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लिश संघाचे कंबरडे मोडले.
भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर होता. चहलला हे स्थान मिळवण्यासाठी 7 वर्षे लागली. 2016 ते 2023 पर्यंत त्याने 80 टी-20 सामन्यांमध्ये 96 विकेट्स घेतल्या. पण अर्शदीपने 2022 ते 2025 पर्यंतच नंबर-1 चे स्थान पटकावले आहे. त्याने त्याच्या फक्त 61 व्या टी-20 सामन्यात ही कामगिरी केली.
𝙈𝙞𝙡𝙚𝙨𝙩𝙤𝙣𝙚 𝙐𝙣𝙡𝙤𝙘𝙠𝙚𝙙 🔓
— BCCI (@BCCI) January 22, 2025
Say hello 👋 to #TeamIndia's leading wicket-taker in Men's T20Is 🔝
Well done, Arshdeep Singh 🙌 🙌
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/K6lQF3la01
हेही वाचा – जळगाव ट्रेन अपघात : आगीची अफवा, लोकांनी साखळी ओढली, ट्रेनमधून उड्या मारल्या, समोरून येणाऱ्या ट्रेनने चिरडले!
भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स
97 अर्शदीप सिंग (61)
96 युजवेंद्र चहल (80)
90 भुवनेश्वर कुमार (87)
89 जसप्रीत बुमराह (70)
89 हार्दिक पांड्या (110)
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!