

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पंजाब प्रांतातील अटक तुरुंगात ठेवण्यात आले आहे. इम्रान खान यांना अदियाला तुरुंगात ठेवलं जाईल, तिथे सर्व सुखसोयी असतील, अशी अटकळ आधी वर्तवली जात होती. पण शेवटच्या क्षणी त्यांना अटक तुरुंगात नेऊन ठेवले.
अटक जेलमध्ये ए आणि बी श्रेणीची सुविधा नाही. येथे फक्त क श्रेणीतील बॅरेक आहेत. अशा परिस्थितीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आता सामान्य कैद्याप्रमाणे तुरुंगात राहावे लागणार आहे. मात्र, डॉनच्या वृत्तानुसार इम्रान खान यांच्यासाठी येथे व्हीव्हीआयपी सेल तयार करण्यात आला आहे. पण या व्हीव्हीआयपी सेलमध्ये इम्रान खान यांना फक्त एक पंखा आणि एक बेड मिळाला आहे.
ब्रिटिश राजवटीत 1905-06 मध्ये अटक जेल बांधण्यात आले. हे जेल सुमारे 67 एकर परिसरात पसरले आहे. ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या काळात बंडात सहभागी असलेल्या लोकांना या तुरुंगात कैद करून ठेवले होते. हे तुरुंग सिंधू नदीच्या काठावर आहे. वृत्तानुसार, या कारागृहात 539 कैदी ठेवण्याची क्षमता आहे, परंतु सध्या येथे 804 कैदी ठेवण्यात आले आहेत.
Whatever little news emerge from Attock Jail indicates that Pakistani Regime is trying hard to mentally torture Imran Khan to break down his will! to crush his indomitable spirit, his self image and his optimistic belief in life!
Why? Is this only about Imran Khan? No! This is…— Moeed Pirzada (@MoeedNj) August 6, 2023
हेही वाचा – WI vs IND 2nd T20 : जिंकता जिंकता हरलो..! भारताचा सलग दुसरा पराभव, पूरननं फोडलं!
या तुरुंगात वेळोवेळी पाकिस्तानातील अनेक नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींना कैदी म्हणून ठेवण्यात आले आहे. 1999 मध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर माजी राष्ट्राध्यक्ष जनरल झिया-उल-हक यांच्याविरोधात बंड करणाऱ्यांनाही या तुरुंगात ठेवण्यात आले होते. पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी हेही याच तुरुंगात होते. मुस्लिम लीग नवाजचे नेते हनीफ अब्बासी हेही काही काळ या तुरुंगात कैदी म्हणून राहिले होते.
पीएमएल-एन सुप्रीमो नवाझ शरीफ यांचा मुलगा हुसेन नवाज, खैबर पख्तुनख्वाचे माजी मुख्यमंत्री सरदार महताब खान, माजी मंत्री डॉ. फारूख सत्तार आणि आझम खान यांनाही अटक तुरुंगात ठेवण्यात आले होते. तोशाखाना प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आता इम्रान खान पुढील पाच वर्षे निवडणूक लढवू शकत नाहीत. मात्र, फिलाह इम्रान खान यांच्याकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय अद्याप शिल्लक आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला इम्रान खान सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!