

The East India Company : संपूर्ण भारत देश आज सोमवारी स्वातंत्र्य दिनाचा ७५वा वर्धापन दिन (Independence Day 2022) साजरा करत आहे. त्याची आठवण म्हणून गेल्या वर्षीपासून देशात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंतचा भारताचा प्रवास अतिशय रंजक राहिला आहे. या ७५ वर्षांत भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. ज्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’नं भारताला गुलाम बनवलं होते, आज एक भारतीय व्यापारी त्या कंपनीचा मालक झाला आहे, यावरूनही भारताच्या वाढत्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावता येतो.
भारतात दोन शतकं कंपनीचं राज्य
ईस्ट इंडिया कंपनीचं नाव कोणाला माहीत नसेल? आठवी-दहावी पर्यंत इतिहासाचा अभ्यास केलेल्या कोणालाही या कंपनीचं नाव चांगलंच माहीत असेल. जे कधी शाळेत गेले नाहीत त्यांनाही ‘कंपनी राज’ नावानं ईस्ट इंडिया कंपनी माहीत आहे. १७व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे १६००च्या सुमारास भारताच्या भूमीवर पहिली पावलं टाकणाऱ्या या कंपनीनं शेकडो वर्षे आपल्या देशावर राज्य केलं. १८५७ पर्यंत भारत या कंपनीच्या ताब्यात होता, ज्याला ‘कंपनी राज’ या नावानं इतिहासात शिकवलं जातं.
आता बनली ई-कॉमर्स कंपनी
एका मार्गानुसार, ईस्ट इंडिया कंपनी ही भारतातील पहिली कंपनी होती, जरी ती भारतीय नसून ब्रिटीश होती. या कंपनीनं भारतालाही गुलामगिरीचं बंधन घालायला लावलं. एकेकाळी ही कंपनी शेतीपासून खाणकाम आणि रेल्वेपर्यंतची सर्व कामं करायची. आता गंमत अशी आहे की, भारताला गुलाम बनवणाऱ्या या ईस्ट इंडिया कंपनीचा मालक भारतीय वंशाचे उद्योगपती संजीव मेहता आहेत. ईस्ट इंडिया कंपनी विकत घेतल्यानंतर मेहता यांनी त्याला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवलं. सध्या ही कंपनी चहा, कॉफी, चॉकलेट आदींची ऑनलाइन विक्री करते.
The East India Co.that ruled over us for 100yrs is now take over by Mumbai born Indian Sanjiv Mehta with $15 million. pic.twitter.com/xVoNgxcx0g
— Dheeraj Jaiswal (@DheerajGbc) August 26, 2015
हेही वाचा – ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवालांची ‘एक’ इच्छा, जी अपूर्ण राहिली!
ईस्ट इंडिया कंपनीचं स्वतःचं सैन्य
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६००० मध्ये ३१ डिसेंबर रोजी झाली. ही कंपनी स्थापन करण्यामागचा एकमेव उद्देश ब्रिटिश साम्राज्यवाद आणि वसाहतवादाला चालना देणं हा होता. ब्रिटनच्या त्या कालखंडाबाबत एक अतिशय लोकप्रिय म्हण आहे की ब्रिटिश राजवटीत सूर्य कधीच मावळत नाही. सूर्याच्या परिघापेक्षा ब्रिटीश साम्राज्य मोठं करण्यात या ईस्ट इंडिया कंपनीचं सर्वात महत्त्वाचं योगदान होतं. कंपनी मूळतः व्यवसाय करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती, परंतु तिला युद्ध करण्याचा अधिकार यासारखे अनेक विशेषाधिकार मिळाले. कंपनीला हा अधिकार ब्रिटिश राजवटीनं आपल्या व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी दिला होता. या कारणास्तव ईस्ट इंडिया कंपनीचे स्वतःचं शक्तिशाली सैन्य होतं.
स्पेन आणि पोर्तुगाल सह प्रतिस्पर्धी कंपनी
१६०० च्या दरम्यान, स्पेन आणि पोर्तुगाल साम्राज्यवाद आणि व्यापारासाठी स्पर्धा करत होते. ब्रिटन आणि फ्रान्स हे उशिरानं उतरले होते, पण वेगानं त्यांचं वर्चस्व वाढवत होते. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारतात आल्यानंतर युरोपात मोठा बदल झाला. वास्को द गामा जहाजात भारतीय मसाले घेऊन जात असे. भारतीय मसाले युरोपसाठी अद्वितीय होते. या मसाल्यापासून वास्को द गामानं अमाप संपत्ती मिळवली. यानंतर भारतीय मसाल्यांचा सुगंध युरोपभर पसरला. भारताच्या उत्कर्षाच्या चर्चांनी युरोपीय साम्राज्यवादी देशांनाही येथे वर्चस्व गाजवण्याची प्रेरणा दिली. ईस्ट इंडिया कंपनीनं हे काम ब्रिटनच्या वतीनं केलं.
हेही वाचा – शेअर मार्केटचे ‘सचिन तेंडुलकर’ होते राकेश झुनझुनवाला! एका दिवसात छापले होते ९०० कोटी!
भारतात, सर थॉमस रो यांनी मुघल सम्राटाकडून ईस्ट इंडिया कंपनीसाठी व्यापार करण्याचे अधिकार मिळवले. कंपनीनं कलकत्ता (आता कोलकाता) येथून भारतात व्यवसाय सुरू केला आणि नंतर चेन्नई-मुंबई हे त्यांचं मुख्य व्यवसाय केंद्र बनलं. भारतात ईस्ट इंडिया कंपनीला प्रथम फ्रेंच कंपनी ‘डेस इंडेस’शी स्पर्धा करावी लागली. १७६४ मध्ये बक्सरची लढाई कंपनीसाठी निर्णायक ठरली. यानंतर कंपनीनं हळूहळू संपूर्ण भारतावर अधिकार प्रस्थापित केला. सन १८५७ च्या उठावानंतर ब्रिटीश साम्राज्यानं कंपनीच्या हातून भारताची सत्ता हिसकावून स्वतःच्या हातात घेतली. आता ते जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांच्या गणनेत कुठंही नाही. भारतीय वंशाच्या संजीव मेहता यांनी २०१० मध्ये १५ मिलियन डॉलर म्हणजेच १२० कोटी रुपयांना विकत घेतली.