

Rahul Gandhi On Mallikarjun Kharge : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा आज ४२ वा दिवस आहे. आंध्र प्रदेशातील कर्नूलमधील चागी गावातून राहुल यांवी ४२व्या दिवसांच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी पदयात्रेत कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राहुल गांधींच्या भारतातील या प्रवासात १०२५ किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे. त्याचवेळी पदयात्रेपूर्वी राहुल गांधी यांनी अदोनी येथील श्री गंगा भवानी मंदिरातही दर्शन घेतले. त्याचवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत खुलेपणाने भाष्य केले.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाचे नवे कॅप्टन बनले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७८९७ मते मिळाली, तर शशी थरूर यांना सुमारे १००० मते मिळाली. यानंतर राहुल गांधींनी याबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, ”मी माझ्याबद्दल किंवा काँग्रेस अध्यक्षांच्या भूमिकेबद्दल काहीही बोलू शकत नाही. ते काम (मल्लिकार्जुन) खर्गे साहेबांचे आहे. माझी भूमिका काय असेल, ते नवे अध्यक्ष ठरवतील.”
हेही वाचा – Congress President Mallikarjun Kharge : सलग ९ वेळा आमदार असलेले मल्लिकार्जुन खर्गे कोण आहेत?
#WATCH| "I can't comment on Congress President's role, that's for Mr Kharge (party's Presidential candidate) to comment on. The President will decide what my role is…", says Congress MP Rahul Gandhi, in Andhra Pradesh
Counting of votes to decide the Congress President underway pic.twitter.com/eRoRBY7QfX
— ANI (@ANI) October 19, 2022
आपल्या पदयात्रेत राहुल गांधी १२ राज्यांतून ३,५७० किमी अंतर कापणार आहेत. हा प्रवास पाच महिने चालणार आहे. आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण, राजकीय केंद्रीकरणाच्या समस्या आणि विचारधारा यांचा लढा म्हणून राहुल गांधी ही रॅली करत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.