मुलींना का करायचं नसतं लग्न? प्रश्नाच्या खोलात गेलात तर मिळतील ‘अशी’ उत्तरं!

WhatsApp Group

मुंबई : मुलगा असो की मुलगी, कुटुंबातील सदस्यांना ते वयात आल्यानंतर एक प्रश्न सतावत असतो. तो म्हणजे लग्नाचा. घरातील तरुण मुलांचं शिक्षण पूर्ण होताच कुटुंबातील सदस्य लग्नाचा विषय काढतात आणि तोच विषय सारखा सारखा पुढं हाकतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा नोकरी लागल्यावर लग्नाच्या प्रश्नानं अनेकदा मुली अस्वस्थ होतात. अशा परिस्थितीत लग्नाचा विषय टाळण्यासाठी मुली कोणत्या प्रकारचे बहाणे देतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पहिलं लगीन शिक्षणाचं मग माझं!

पालक अभ्यासाबाबत नेहमीच गंभीर असतात. आपल्या मुलानं शिक्षण घेऊन पुढं जावं, मोठं व्हावं, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांकडं लग्नाचा विषय काढण्यासाठी ते कारणं शोधतात. मुलांपेक्षा मुलींचं लग्न लवकर करण्याकडं भारतीय पालकांचा कल असतो. मात्र, आजकाल मुलींना लहान वयात लग्न करायचं नसतं आणि अशा परिस्थितीत घरातून लग्नाचा जास्त दबाव पडला, तर त्या पुढील अभ्यासाचे कारण देत हा विषय टाळण्याचा प्रयत्न करतात.

शिक्षण झालं..आता नोकरी

शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरी मिळवण्यासाठी मुलींना संघर्ष करावा लागतो. नोकरी मिळाल्यानंतर पालक मुलींच्या मागं लग्नाचा विषय घेऊन पळत असतात. मात्र, कमी पगार, चांगल्या पदावर जाण्यासाठी इच्छा अशी कारणं देत मुली लग्नाचा विषय टाळतात. आणि यशस्वी करिअरचं कारण देत लग्नाचा विषय पुढं ढकलण्याचा प्रयत्न करतात. जो पर्यंत स्वावलंबी बनणार नाही, तोपर्यंत लग्न न करण्याची इच्छा मुलींची असते. म्हणून त्या लग्नापासून दूर पळतात. करियरमध्ये यशस्वी झाल्यानंतरच त्यांना लग्न करायचं असतं.

जुनं प्रेम…

घरातील लोक हात धुवून लग्नासाठी मागं लागतात, तेव्हा मुली एकामागून एक कारणं तयार करतात. अशा स्थितीत तिच्या करिअरनंतर ती अजूनही तिचं जुनं प्रेम विसरलेली नाही, हे सांगायलाही त्या मागंपुढं पाहत नाही. यातून बाहेर यायला मला वेळ हवा आहे, असं सांगून ते पालकांना भावनिक करतात. मुलींना भावनिक झालेलं पाहून पालकही भावनिक होतात. आणि लग्नाचं प्रकरण काही दिवस पुढं ढकललं जाते.

प्रेमविवाह करण्यात जातो वेळ…

आजकाल तरुण मंडळींचा अरेंज्ड मॅरेजच्या तुलनेत प्रेमविवाह करण्याकडं जास्त कल आहे. अशा परिस्थितीत जेव्हा पालक लग्नाबद्दल मुलीकडं विषय काढतात, तेव्हा त्या प्रेमविवाह करण्याची इच्छा बोलून दाखवतात. आजकालचे पालकही मुलींना प्रेमविवाह करण्याची परवानगी देतात. पण मला अजून योग्य जोडीदार मिळाला नाही आणि मी त्याचा शोध घेत आहे. सापडला की सांगते, असं म्हणत मुली काही काळासाठी का होईना लग्नाचा विषय टाळतात. परिणामी पालकांनाही गप्प बसावं लागतं. त्यामुळे तुमच्याही घरातील मुली लग्नाचा विषय काढल्यानंतर अशा प्रकारची कारणं देत असतील तर समजून घ्या, की त्यांना आत्ता लग्न करण्याची इच्छा नाही.

Leave a comment