

मुंबई : प्रत्येक ऋतूमधे कसं जगावं, कसं वागावं, काय खावं, काय खाऊ नये या सर्व गोष्टींबद्दलचे नियम आयुर्वेदानं सांगितले आहेत. त्यामुळं तशा गोष्टींचं पालनही आपल्याकडून होत असतं. पावसाळा आला की आपल्याला गरमागरम खावसं वाटतं. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर पावसाचं आपल्याकडं चांगलंच आगमन झालं आहे. पाऊस पडल्यानंतर वातावरण कसं आल्हाददायक होऊन जातं आणि अशा वातावरणाचा आनंद चहा आणि भजी शिवाय अपूर्णच आहे. पाऊस पडताच चहासोबत भजी खाण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात येते. पण पावसाळ्यातच ही इच्छा का निर्माण होते याचा कधी विचार केला आहे का तुम्ही? चहा, भजी आणि पावसाचा काय संबंध माहिती आहे का तुम्हाला?
शास्त्रीय कारण..
पावसाळ्यात आपल्या शरीराला सूर्यप्रकाश मिळत नाही. संशोधनानुसार सूर्यप्रकाश न मिळणं म्हणजे व्हिटॅमिन-डी न मिळणं. त्यामुळं शरीरातील सेरोटोनिन नावाच्या हार्मोनची पातळी कमी होते. या कारणास्तव, आपल्यामध्ये कार्बोहायड्रेट्सची लालसा वाढते. आपलं मन अशा गोष्टी खाण्याकडं झुकतं ज्यामुळं आपल्याला या तृष्णेमध्ये आराम मिळतो आणि सेरोटोनिनची पातळी वाढते. अशा परिस्थितीत भजीसोबत सोबत चहाचे कॉम्बिनेशन सर्वाधिक आवडतं आहे.
हेही वाचा – फक्त ७५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर..! ‘ही’ कपंनी देतेय सेवा; लगेच करा बुकिंग!
ही एक नैसर्गिक लालसा आहे. पावसाळ्यात जेव्हा आळस येतो तेव्हा अशा तळलेल्या अन्नाची लालसा वाढते. भजीसोबत खाल्लेल्या या मसालेदार चटण्यांमुळं आळस आणि कंटाळा निघून जातो. तसं बघायला गेलं भजींचा संबंध समाजाच्या समृद्धीशी आहे. समाजात समृद्धी आल्यानं भजी खाण्याची प्रथा सुरू झाली. भजी हे महागडे अन्न आहे. कारण ते तेलात तळलं जातं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनही वापरलं जातं. आता भजीचा शोध कुणी लावला याबाबत पुरावा नाही. पण पावसाळा पडला की भजी खाण्याची इच्छा होणं ही एक नैसर्गिक भावना असल्याचे आभ्यासक सांगतात.
पण पावसात उदास वाटण्याचं कारण काय?
पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसल्यामुळं आपल्या शरीरात अनेक बदल घडतात. यामुळे हळूहळू आळस येऊ लागतो. कोणतंही काम करायची इच्छा होत नाही. जेव्हा शरीराला सूर्यप्रकाश मिळत नाही, तेव्हा शरीरातील पाइनल ग्रंथी मेलाटोनिन नावाचे द्रव शरीरात सोडतात, ज्यामुळं सुस्तीची भावना निर्माण होते. पावसाळ्यात आपल्या शरीराचं घड्याळही बिघडते. अनेकवेळा मूड चांगला होईल, असं काहीतरी खावंसं वाटतं. मसालेदार आणि गरम अन्न खाल्ल्यानं आपला मूड सुधारतो म्हणून पाऊस पडल्यावर आपल्या चहा आणि भजी खाण्याची इच्छा होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!