…म्हणून ‘मॅन ऑफ द मॅच’ जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीतून बाहेर?

WhatsApp Group

भारतीय संघाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. आता दोन्ही संघांमधला तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. पण त्याआधीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी येत आहे.

दुसऱ्या कसोटीत 9 विकेट्स घेऊन सामनावीर ठरलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)तिसऱ्या कसोटीतूनन विश्रांती घेणार आहे. क्रिकबझने आपल्या अहवालात हा दावा केला आहे.

अहवालानुसार, मालिकेतील सर्व 5 सामने खेळल्याने बुमराहच्या फिटनेसवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच निवड समिती आणि संघ व्यवस्थापन बुमराहला तिसऱ्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेऊ शकतात. बुमराह शेवटच्या 2 सामन्यांमध्ये अगदी फ्रेश मूडमध्ये प्रवेश करू शकतो.

जसप्रीत बुमराहने विशाखापट्टणम कसोटीच्या दोन्ही डावात 33.1 षटके टाकली होती. या कालावधीत 91 धावांत एकूण 9 बळी घेतले. त्यामुळे बुमराहला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. पहिल्या कसोटीत बुमराहने जवळपास 25 षटके टाकली.

दुसऱ्या कसोटीत बुमराहने इतर गोलंदाजांपेक्षा जास्त गोलंदाजी केली. तर भारतीय प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट असलेल्या तीनही फिरकीपटूंनी बुमराहपेक्षा कमी गोलंदाजी केली. रवीचंद्रन अश्विनने 30 षटके, कुलदीप यादवने 32 षटके आणि अक्षर पटेलने केवळ 18 षटके टाकली. तर वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला केवळ 12 षटके टाकता आली.

हेही वाचा – ब्रेस्ट कॅन्सर पीडित रुग्णांना 4.2 लाखांचे औषध मिळणार मोफत

तिसऱ्या कसोटीत बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकते. दुसऱ्या कसोटीत सिराजला विश्रांती देण्यात आली होती. तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या मालिकेत खेळणे खूप अवघड आहे, कारण त्याला घोट्याच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला पाठवण्यात आले आहे. त्यांना बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment