

टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विराट कोहली किंवा रोहित शर्मा 2024 च्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) खेळणार की नाही याबाबत सस्पेंस होता, पण आता यावरून एकप्रकारे पडदा उठला आहे. या दोन्ही खेळाडूंनी जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या निवड समितीला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 साठी संघ निवडण्यापूर्वी विचारमंथन करावे लागणार आहे.
सध्या शिव सुंदर दास आणि सलील अंकोला हे दोन निवडकर्ते दक्षिण आफ्रिकेत आहेत, चीफ सिलेक्टर आगरकरही केपटाऊन येथे रंगत असलेल्या दुसऱ्या कसोटीला उपस्थित राहणार आहे. रोहित आणि कोहली या दोघांनी 10 नोव्हेंबर 2022 नंतर एकही टी-20 सामना खेळलेला नाही. अफगाणिस्तानविरुद्ध संघाची घोषणा करण्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड तसेच कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित आणि स्टार फलंदाज कोहली यांच्याशी आगरकर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
आता हे पाहावे लागेल, की आगरकर आणि इतर निवडकर्ते 11 जानेवारीपासून मोहाली येथे सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित आणि कोहली या दोघांची निवड करतील, की IPL दरम्यान त्यांचा फॉर्म आणि फिटनेसच्या आधारावर त्यांना थेट संघात समाविष्ट करतील.
हेही वाचा – युवा परिवर्तनतर्फे खोपोलीतील विद्यार्थ्यांना ‘सीड बॉल्स’ बनवण्याचे धडे
वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी आयपीएल स्टार्ससह सुमारे 30 टी-20 स्पेशालिस्ट खेळाडूंवर लक्ष ठेवले जाईल. आयपीएलच्या दोन महिन्यांत किमान 25 ते 30 खेळाडूंची निवड करून त्यांच्या कामगिरीवर नजर ठेवली जाण्याची शक्यता आहे. आयपीएल दरम्यान दुखापती किंवा तंदुरुस्तीच्या समस्या असू शकतात आणि निवड समितीला प्रत्येक स्लॉटसाठी दोन खेळाडूंची आवश्यकता असेल, जेणेकरुन सारखे बदली खेळाडू तयार करता येतील.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!