

Asia Cup 2023 India tour of Pakistan : या आठवड्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार आहे. मात्र याआधीच दोन्ही संघ आणि दोन्ही देशांमध्ये वेगळेच युद्ध सुरू झाले आहे. पुढील वर्षी भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्यासाठी हे युद्ध सुरू आहे. वास्तविक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सांगितले की, भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या आशिया कप २०२३ साठी पाकिस्तानला जाणार नाही. या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
जय शाहच्या वक्तव्यावर आफ्रिदी भडकला
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ट्वीटमध्ये म्हटले आहे, “गेल्या १२ महिन्यांत जेव्हा दोन्ही बाजूंनी (भारत आणि पाकिस्तान) चांगले मैत्रीपूर्ण वातावरण आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये चांगली भावना निर्माण झाली आहे. मग बीसीसीआयच्या सचिवांनी टी-२० विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी हे विधान का केले? यावरून भारतात अनुभवी क्रिकेट प्रशासनाचा अभाव दिसून येतो.”
When excellent comradery between the 2 sides in the past 12 months has been established that has created good feel-good factor in the 2 countries, why BCCI Secy will make this statement on the eve of #T20WorldCup match? Reflects lack of cricket administration experience in India
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) October 18, 2022
हेही वाचा – PM मोदींचं तरुणांना दिवाळी गिफ्ट..! ७५ हजार लोकांना मिळणार नोकऱ्या; वाचा सविस्तर
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंही बीसीसीआयला दिली धमकी
दुसरीकडे, जय शाह यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) देखील संतापले आहे. पीटीआयनुसार, पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्याशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, भारताच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान कठोर निर्णय घेण्यास तयार आहे, परंतु ते आयसीसी आणि एसीसीच्या नियमांची देखील काळजी घेईल. इतकेच नाही तर पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेण्याची धमकीही पीसीबीने दिली आहे. आशिया चषकासाठी पाकिस्तानात न येण्याच्या भारताच्या निर्णयावर पीसीबीचे म्हणणे आहे की ते २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातूनही आपले नाव मागे घेऊ शकतात.
Jay Shah (in Cricbuzz) confirms India won't travel to Pakistan for Asia Cup 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) October 18, 2022
१६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. सध्या पात्रता सामने खेळले जात आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला सुपर-१२ च्या गट-ब मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात टीम इंडियाशिवाय पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका देखील आहेत. तर पात्रता फेरीनंतर दोन संघ या गटात प्रवेश करतील. पात्रता फेरीतील गट-२ मधील विजेता आणि गट-१ मधील उपविजेत्या संघाला या गट-ब मध्ये स्थान मिळेल.