

T20 World Cup 2022 IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये अॅडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे सामना थांबेपर्यंत बांगलादेशने ७ षटकांत कोणतेही नुकसान न करता ७७ धावा केल्या होत्या. लिटन दास ५९ आणि नजमुल हसन शांतो ७ धावा करून क्रीजवर आहेत. मुसळधार पावसामुळे खेळपट्टी झाकली गेली होती. पावसामुळे खेळ सुरू न झाल्यास डकवर्थ लुईस नियम लागू केला जाऊ शकतो.
पावसाचे आगमन भारतासाठी चांगली गोष्ट नाही कारण आतापर्यंत बांगलादेश डकवर्थ लुईस नियमानुसार १७ धावांनी पुढे आहे. म्हणजेच यापुढे सामना झाला नाही आणि डकवर्थ लुईसचा नियम लागू झाला तर भारत हा सामना गमावेल. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने १८४ धावा केल्या.
Rain arrives with Bangladesh ahead on DLS – the par score after seven overs is 49 #T20WorldCup #INDvBAN
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 2, 2022
हेही वाचा – वाईट बातमी..! गूगल बंद करतंय रस्ता दाखवणारं ‘हे’ App; वाचा कारण!
Essentially, if India lose this match they will need to a) beat Zimbabwe & b) need Pakistan to beat Bangladesh. However, if Pakistan have beaten SA then Pak & India will be locked on points & NRR will decide who qualifies. India have the advantage of playing last. #T20WorldCup
— Freddie Wilde (@fwildecricket) November 2, 2022
…मग भारत सेमीफायनलमध्ये जाणार?
जर भारतीय संघ बांगलादेशविरुद्धचा सामना हरला तर त्याच्या उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता कमी होऊ शकते. बांगलादेशविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारताचे कमाल सहा गुण होऊ शकतात. सहा गुणांपर्यंत पोहोचण्यासाठीही भारताला शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेवर मात करावी लागेल.
जर भारत हा सामना बांगलादेशकडून हरला, बांगलादेशने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले तर ते दक्षिण आफ्रिकेसोबत उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. पाकिस्तानशिवाय दक्षिण आफ्रिकेला कमकुवत नेदरलँड्सचा सामना करावा लागणार असून एक सामना जिंकल्यानंतर ते ७ गुणांवर पोहोचतील.