T20 World Cup 2022 : …तर भारत-पाकिस्तान मॅच रद्द होणार! २३ ऑक्टोबरला घोंगावतंय ‘हे’ संकट

WhatsApp Group

T20 World Cup 2022 IND vs PAK : टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सनी पराभव करून इतिहास रचला होता. क्रिकेट विश्वचषकात भारताला आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे रविवारी, २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या सामन्यावर अडचणीचे ढग दाटून आले आहेत.

हा हाय-व्होल्टेज सामना पावसाने वाहून जाऊ शकतो, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने दिली आहे. या दिवशी पावसाची ८० टक्के शक्यता आहे. विशेषतः संध्याकाळी. म्हणजेच मॅचची रंजक मजा वाहून जाण्याची शक्यता आहे. रविवारी मेलबर्नमध्ये पाऊस पडला, तर क्रिकेट विश्वचषकात दोन्ही संघांमधील सामना पावसाने वाहून जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. १९९२ च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा आमनेसामने आले होते.

हेही वाचा – VIDEO : टायगर श्रॉफच्या सत्कारासाठी राहुल देशपांडेचं गाणं थांबवलं..! भाजपवर नेटकरी भडकले

रिझर्व्ह डे नाही..!

ब्रिस्बेनमध्ये बुधवारी भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सराव सामना पावसामुळे रद्द झाला. त्याचवेळी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी होबार्टमध्येही पावसाची ६०% शक्यता आहे, जिथे आयर्लंडचा सामना वेस्ट इंडिजशी होईल आणि स्कॉटलंडचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये फेरी-१ मधील गट-ब ते सुपर-१२ पर्यंतचे संघ निश्चित होतील. सेमीफायनल आणि फायनल वगळता ग्रुप स्टेज मॅचसाठी राखीव दिवस नाही. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना येथे १-१ गुण मिळतील.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment