

Virat Kohli Test Cricket Retirement : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि खेळाच्या दीर्घ स्वरूपातील त्याच्या भविष्याबद्दल वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अटकळींना पूर्णविराम दिला. आता तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळेल. त्याच्या निवृत्तीनंतर, कसोटी स्वरूपातून भारतीय अनुभवी खेळाडूंची बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. रवीचंद्रन अश्विन (डिसेंबरमध्ये) आणि रोहित शर्मा (गेल्या आठवड्यात) यांनीही या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.
३६ वर्षीय विराट कोहलीला शेवटचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना पाहिले गेले होते. जिथे भारताला ५ सामन्यांच्या मालिकेत १-३ असा पराभव पत्करावा लागला. कोहलीने मालिकेतील पहिल्या सामन्यात म्हणजेच पर्थ कसोटीत शतक झळकावले, पण त्यानंतर तो संघर्ष करताना दिसला.
पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड समिती काही दिवसांत संघ निवडणार असताना कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कोहलीने गेल्या वर्षीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
विराट कोहलीने जून २०११ मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर कोहलीने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १५ धावा केल्या. त्याची शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे जानेवारी २०२५ मध्ये खेळली गेली होती. या शेवटच्या कसोटीत कोहलीने पहिल्या डावात १७ धावा आणि दुसऱ्या डावात ६ धावा केल्या.
किंग कोहलीने १२३ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत.
Many other players Are in Team India But No One can Match this Aura
— Dhruv (Parody) (@_dhruv_101) May 12, 2025
Not Just in Test cricket but ODIs Also
– 123 matches
– 9230 runs.
– 30 Hundreds
– 31 fifties.
– 46.85 Average
GOAT FOR A REASON 🫡👑
– END OF AN ERA –
KING RETIRED NOW 💔#BCCI #TestCricket #ViratKohli pic.twitter.com/EDdT4L3PvT
विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरून निवृत्तीची घोषणा केली. तो म्हणाला, ‘’कसोटी क्रिकेटमध्ये मी पहिल्यांदा निळी जर्सी घातली त्याला १४ वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला कोणत्या प्रवासावर घेऊन जाईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला आकार दिला आणि मला असे धडे शिकवले जे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाईन. पांढऱ्या जर्सीत खेळणे हा एक अतिशय वैयक्तिक अनुभव आहे. मी या फॉरमॅटपासून दूर जात आहे, तेव्हा ते सोपे नसते – पण ते योग्य वाटते. मी माझे सर्वस्व दिले आहे आणि त्याने मला अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे. खेळाबद्दल, मैदानावरील लोकांबद्दल आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने मी निघतो. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहेन.’’
विराट हा कसोटी इतिहासातील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले ज्यामध्ये संघाने ४० सामन्यांमध्ये विजय मिळवला. कोहलीने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारतीय संघ सातव्या स्थानावर होता. पण स्वतःच्या आणि त्याच्या सहकारी खेळाडूंच्या कठोर परिश्रमामुळे कोहली जागतिक क्रमवारीत नंबर-१ वर पोहोचला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!