फक्त 66 दिवस संसार… पण 13 वर्ष कोर्टात युद्ध! एकमेकांविरोधात 40 केसेस, शेवटी सुप्रीम कोर्टाचा धक्कादायक निर्णय!

WhatsApp Group

Supreme Court Divorce Case : लग्नानंतर अवघे 65–66 दिवस एकत्र राहिलेल्या पती-पत्नीमध्ये तब्बल 13 वर्षे चाललेली कटू कायदेशीर लढाई अखेर संपुष्टात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, इतक्या कमी काळ एकत्र राहिलेल्या या दांपत्याने एकमेकांविरोधात 40 पेक्षा अधिक खटले दाखल करून न्यायालयीन व्यवस्थेलाच जणू युद्धभूमी बनवले होते. या प्रकरणाचा शेवट सुप्रीम कोर्टात झाला असून, देशातील सर्वोच्च न्यायालयाने दांपत्याला थेट घटस्फोट देत ‘पूर्ण न्याय’ केला आहे.

सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा, 10 हजारांचा दंड

न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांना जोरदार फटकारले. न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि मनमोहन यांच्या खंडपीठाने संविधानाच्या अनुच्छेद 142 अंतर्गत विशेष अधिकार वापरत थेट घटस्फोट मंजूर केला.

यासोबतच,

  • पती व पत्नीला प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड
  • भविष्यात एकमेकांविरोधात कोणताही नवीन खटला दाखल करण्यास बंदी
  • दंडाची रक्कम Supreme Court Advocates-on-Record Association मध्ये जमा करण्याचे आदेश

न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोर्ट हे वैयक्तिक सूड उगवण्याचे मैदान नाही.”

“कोर्टाला युद्धाचे मैदान बनवू नका”

खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, “पक्षकार केवळ 65 दिवस एकत्र राहिले, पण मागील एका दशकाहून अधिक काळ त्यांनी विविध न्यायालयांमध्ये एकमेकांविरोधात खटले दाखल करत न्यायप्रणाली अडवून ठेवली.” दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील विविध न्यायालयांमध्ये ही प्रकरणे सुरू होती. 40 पेक्षा अधिक खटले दाखल होणे हे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

आधी मध्यस्थी, मग खटला – सुप्रीम कोर्टाचा सल्ला

सुप्रीम कोर्टाने वैवाहिक वादांमध्ये मेडिएशन (मध्यस्थी) ला प्राधान्य देण्यावर जोर दिला.
न्यायालयाने सांगितले की,

  • आजकाल वैवाहिक वाद प्रचंड वाढले आहेत
  • सुप्रीम कोर्ट ट्रान्सफर पिटीशनने भरून गेले आहे
  • अनेकदा हे खटले सूडाचे हत्यार बनतात

समाजाच्या हितासाठी शक्यतो लग्न टिकवण्याचा प्रयत्न व्हायला हवा, मात्र जेव्हा हे स्पष्ट होते की नातं पूर्णपणे तुटलं आहे आणि एकत्र राहण्याची कोणतीही शक्यता नाही, तेव्हा औपचारिकरित्या नातं संपवणंच योग्य ठरतं, असे न्यायालयाने नमूद केले.

“कदाचित ते एकमेकांसाठी बनलेच नव्हते…”

या प्रकरणात,

  • दांपत्याचा विवाह जानेवारी 2012 मध्ये झाला
  • पत्नीने 65 दिवसांतच क्रूरतेचा आरोप करत घर सोडलं
  • त्यानंतर दोघेही वेगळे राहत होते

“आज सहनशीलता कमी झाली आहे, अहंकार वाढला आहे. एक दशकाहून अधिक काळातील कटुतेनंतर वेळ मागे नेणे शक्य नाही. कदाचित ते एकमेकांसाठी बनलेच नव्हते”, अशी महत्त्वाची टिप्पणी घटस्फोट मंजूर करताना खंडपीठाने केली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment