कोल्हापूरला ‘कोल्हापूर’ हे नाव कसं आणि का पडलं? जाणून घ्या…

WhatsApp Group

Kolhapur History : कोल्हापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण आहे. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, हे शहर सांस्कृतिक आणि पारंपारिक गोष्टींसाठी देखील प्रसिद्ध आहे. या शहराला दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. पण कोल्हापूर शहराला कोल्हापूर हे नाव कसं आणि का पडलं, असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? या लेखात आम्ही तुम्हाला कोल्हापूर हे नाव का, केव्हा आणि कसं पडलं ते सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

कोल्हापूरचा इतिहास

या शहराला कोल्हापूर हे नाव का पडलं हे जाणून घेण्यापूर्वी या शहराचा प्राचीन इतिहास जाणून घेऊया. या शहराचा इतिहास खूप रंजक आहे. ब्रिटिश भारताच्या काळात हे शहर भारतीय मराठ्यांचे संस्थान होतं. त्यावेळी ते डेक्कन विभागाच्या अखत्यारीत होतं. असे म्हटलं जातं की त्यावेळी हे मराठा साम्राज्याचे चौथं सर्वात महत्वाचं संस्थान होतं. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी हे शहर १९ तोफांचं संस्थान म्हणूनही प्रसिद्ध होतं. हे शहर प्राचीन आणि मध्ययुगीन काळात अनेक नावांनी ओळखलं जात असे. असं म्हणतात की ‘दक्षिण काशी’ व्यतिरिक्त हे शहर ‘अंबाबाई’ म्हणूनही ओळखलं जात असे.

हेही वाचा – असा खासदार पाहिलाय का..? स्वत:च्या हातानं धुतलं टॉयलेट; VIDEO व्हायरल

पौराणिक मान्यतेनुसार या शहरात कोल्हासूर राक्षस राहत होता, त्यामुळे स्थानिक लोक खूप अस्वस्थ होते. हा अत्याचार दूर करण्यासाठी लोकांनी महालक्ष्मी देवीची प्रार्थना केली. या प्रार्थनेनंतर नऊ दिवस महालक्ष्मीनं कोल्हासूर या राक्षसाशी युद्ध केलं आणि शेवटी कोल्हासूरचा पराभव झाला. युद्ध हरल्यानंतर कोल्हासूर राक्षस माता महालक्ष्मीकडे गेला आणि तिच्याकडं वरदान मागितलं की माझ्या नावानं हे शहर ओळखलं जावं. तेव्हापासून या शहराचं नाव बदलून कोल्हापूर असं झालं असं सांगितलं जातं. कोल्हापुरी चप्पल संपूर्ण भारतात खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चपलांमुळे शहराची ओळख मोठ्या प्रमाणात झाल्याचं बोललं जातं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment