

Vijay Rally Stampede : तमिळनाडूतील करूर जिल्ह्यात 27 सप्टेंबरच्या रात्री घडलेली एक घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी ठरली आहे. अभिनेता ते राजकारणी झालेल्या विजय यांच्या रॅलीत सहभागी झालेल्या हजारोंच्या गर्दीत अचानक भीषण भगदड माजली. या भगदडीमध्ये 39 लोकांचा मृत्यू झाला असून, 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेने विजय यांच्या नव्या राजकीय प्रवासात गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
विजय म्हणजे फक्त नेता नाही, तो स्टार
विजय हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असून त्यांनी नुकतीच ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) या पक्षाची स्थापना केली आहे. त्यांच्या रॅलींना मिळणारा प्रतिसाद पाहता, त्यांनी काही महिन्यांतच तमिळनाडूमध्ये मोठी राजकीय उपस्थिती निर्माण केली आहे. पण करूर येथील रॅली त्यांच्या यशातल्या काळ्या अध्यायासारखी ठरली.
काय घडलं नेमकं?
रात्रीच्या कार्यक्रमासाठी करूरमध्ये सुमारे 10000 लोकांच्या उपस्थितीची परवानगी होती. पण विजयच्या चाहत्यांचा जल्लोष इतका प्रचंड होता की 30000 पेक्षा अधिक लोक मैदानात जमा झाले. काहीजण विजयला पाहण्यासाठी झाडावरही चढले. विजयची गाडी गर्दीत पोहोचली आणि तेव्हाच एक झाडाचा फांदी तुटून चाहत्यांच्या अंगावर कोसळली. यामुळे भीती पसरली आणि लोकांनी एकमेकांवर चढून पळायला सुरुवात केली.
At least 39 dead, 51 injured in stampede at Indian actor Vijay's rally https://t.co/45XxIDFElC
— Nikkei Asia (@NikkeiAsia) September 28, 2025
हेही वाचा – तिरुपतीच्या रांगा आता AI सांभाळणार? काय भन्नाट तंत्रज्ञान!
धक्कादायक आकडे
या दुर्घटनेत 39 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 16 महिला आणि 6 लहान मुलांचाही समावेश आहे. 100 हून अधिक जखमी रुग्णांना करूर व त्रिचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलीस आणि आयोजक अपयशी?
या कार्यक्रमासाठी 500 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते, पण एवढ्या गर्दीचा अंदाज आयोजक आणि पोलिसांनी लावलेला नव्हता. प्रशासनाकडून यावर चौकशी सुरू असून आयोजकांनी पुरेशी तयारी केली नव्हती का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
A stampede at a political rally for popular actor #Vijay in southern #India kills 36, injures 40
— ⚡️🌎 World News 🌐⚡️ (@ferozwala) September 28, 2025
The health minister in the southern Indian state of #Tamil_Nadu says a stampede at a rally for a popular actor and politician has killed at least 36 people & injured 40 others… pic.twitter.com/m1ar9lA5Gv
TVK आणि कोर्टातील लढाई
ही पहिली वेळ नाही जेव्हा विजय यांच्या रॅलींना अडचणींना सामोरं जावं लागलं. याआधीही त्यांच्यावर मर्यादा घालण्याचे प्रयत्न झाले आहेत. TVK पक्षाने थेट मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करत DMK सरकारवर भेदभाव केल्याचा आरोप लावला. 18 सप्टेंबरच्या सुनावणीत न्यायालयाने सरकारला स्पष्टपणे सांगितले की सर्व पक्षांकडून सुरक्षा ठेव घेतली जावी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानासाठी पक्ष जबाबदार राहतील अशी स्पष्ट अट लागू करावी.
रॅलीवरील निर्बंध आणि विजयचा टोला
विजय यांनी याआधी त्रिचीच्या सभेत भाषण करताना, “CM साहेब, तुम्ही मला धमकावताय का?” असा सवाल उपस्थित करत DMK सरकारवर थेट टीका केली होती. त्यांनी पोलिसांकडून आलेल्या “हात न हालवण्याच्या” सूचनेलाही विनोदी अंगाने उत्तर दिलं होतं – हे स्पष्ट दर्शवतं की विजय स्वतःला रोखून ठेवू इच्छित नाहीत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा