IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये काय बोलणं झालं? प्रत्यक्षदर्शीनं केला खुलासा!

WhatsApp Group

IPL 2023 Virat Kohli vs Gautam Gambhir : आयपीएल 2023 मधील लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील सामन्यानंतर दिल्लीचे दोन दिग्गज विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मैदानावरील भांडणामुळे त्यांच्यात एकमेकांबद्दल असलेली कटुता पुन्हा एकदा समोर आली आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या भांडणात दोघांनी शिवीगाळ केली. हा वाद कोठून सुरू झाला यावर वेगवेगळी मते आहेत. काहीजण याला बालिश म्हणत आहेत, तर काहीजण या शत्रुत्वात मसाला शोधत आहेत, तर काहींच्या मते ‘सज्जनांच्या खेळात’ अशा घटना टाळल्या पाहिजेत.

प्रत्यक्षदर्शीने सांगितली संपूर्ण घटना

एका टीममध्ये सामील असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, ‘तुम्ही टीव्हीवर पाहिले की काइल मायर्स आणि कोहली मॅचनंतर काही वेळ एकत्र फिरत होते. मायर्सने कोहलीला विचारले की तो सतत त्याच्याशी का गैरवर्तन करत आहे, ज्यावर कोहली म्हणाला की तो (मायर्स) त्याच्याकडे का पाहत आहे. याआधी अमित मिश्राने पंचांकडे तक्रार केली होती की, विराट 10व्या क्रमांकाचा फलंदाज नवीन उल हक याला सतत शिवीगाळ करत आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल झाले स्वस्त, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर

प्रत्यक्षदर्शी म्हणाला, ”गौतमला वाटले की परिस्थिती आणखी बिघडेल, म्हणून त्याने मायर्सला तेथून खेचले आणि काही बोलू नकोस असे सांगितले. तेव्हा विराट काहीतरी बोलला. गौतम म्हणाला, ”तू काय बोलत आहेस? यावर विराट म्हणाला की, मी तुला काही बोललो नाही, तू का यात पडतोय? यावर गौतम म्हणाला की, तू माझ्या खेळाडूशी बोलला आहेस, तर तू माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केलीस आणि विराटने तू तुझ्या कुटुंबाची काळजी घे, असे सांगितले.”

यानंतर गंभीर विराटला म्हणाला, ”आता तू मला शिकवशील?” यानंतर दोघेही वेगळे झाले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार दोघांचे वागणे बालिश होते. याआधी 2013 मध्येही आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यादरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. कोहली सुपरस्टार होण्याच्या मार्गावर होता तर गंभीर केकेआरचा कर्णधार होता.

भारताच्या एका माजी खेळाडूने सांगितले की, “दोघांमधील नाते खूपच गुंतागुंतीचे आहे. गौतम हा वाईट माणूस नाही पण त्याला सामोरे जाणे अवघड आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराटच्या नावाचा जयघोष करणाऱ्या प्रेक्षकांकडे त्याने बोट दाखवायला नको होते. 4 मिलियन फॉलोअर्स तर भाजप खासदार गंभीरचे 12.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. एकंदरीत, भारतीय क्रिकेट चाहत्यांना लक्षात ठेवायला आवडणार नाही अशी ही घटना आहे कारण त्यात कोणाचेही वर्तन कौतुकास्पद नव्हते.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment