Ranji Trophy Final Controversy : आठ वेळा विजेतेपद पटकावलेल्या कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील रणजी ट्रॉफी अंतिम सामना रंगात आला असताना दुसऱ्या दिवशी एक धक्कादायक प्रसंग घडला. जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोगरा याने संतापाच्या भरात कर्नाटकचा क्षेत्ररक्षक के. व्ही. अनीश याच्याशी वाद घालत थेट डोके आपटल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे मैदानावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
नेमके काय घडले?
सामन्याच्या 101व्या षटकात डोगराने कृष्णाच्या चेंडूवर कडा लागून चौकार मिळवला. त्यानंतर शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या अनीश याच्याशी त्याची शाब्दिक चकमक झाली. वाद वाढताच डोगरा हेल्मेट घातलेल्या अवस्थेत अनीशकडे पुढे गेला आणि डोके आपटले.
It's a headbutt by the J&K captain. Just not done in a cricket match #RanjiTrophy pic.twitter.com/Z7Jgv4XuiS
— Amol Karhadkar (@karhacter) February 25, 2026
तत्काळ दोन्ही संघांचे खेळाडू आणि पंच मध्यस्थी करण्यासाठी धावले. कर्नाटकचा वरिष्ठ खेळाडू मयंक अगरवाल यांनी दोघांना वेगळे केले. काही वेळाने डोगराने माफी मागण्याचा प्रयत्न केला, मात्र अनीशने ती स्वीकारली नाही.
दरम्यान, कर्नाटकचे वरिष्ठ खेळाडू के. एल. राहुल आणि अगरवाल यांनी डोगरावर शाब्दिक दबाव कायम ठेवला, अशी माहिती समोर आली आहे.
तरीही डोगराची झुंज कायम
या सर्व गदारोळातही डोगरा संयम राखत 36 धावांवर नाबाद राहिला. दुपारच्या जेवणावेळी जम्मू-काश्मीरने 4 बाद 380 धावा केल्या होत्या.
पहिल्या दिवशी डोगराला विजयकुमारच्या उसळी घेतलेल्या चेंडूमुळे दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो 9 धावांवर निवृत्त झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
🚨 BREAKING: PARAS DOGRA FINED AFTER RANJI FINAL CLASH 🚨
— All about Cricket (@CricHitmanThala) February 25, 2026
BCCI fines Paras Dogra 50% of match fee after headbutt incident with KV Anish on Day 2.
He called it “heat of the moment” board calls it misconduct.
Meanwhile, Shubham Pundir smashes 121 as J&K race to 527/6 vs… pic.twitter.com/N2x8zUEFGf
दरम्यान, कर्नाटकने सकाळच्या सत्रात शुभम पंडित (121 धावा) आणि अब्दुल समद (61 धावा) यांची महत्त्वाची बळी घेत चांगली सुरुवात केली होती.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
या घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी डोगराच्या कृतीवर टीका केली. काही चाहत्यांनी लिहिले की, “ही कृती अत्यंत अव्यावसायिक होती.”
तर काहींनी आश्चर्य व्यक्त करत म्हटले, “डोगरा सहसा शांत स्वभावाचा असतो, मग असा संताप का?”
आता पुढे काय?
या प्रकारावर सामना अधिकाऱ्यांकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात घडलेल्या या प्रसंगामुळे क्रीडाजगतात चर्चेला उधाण आले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा