

Ravichandran Ashwin : बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रवीचंद्रन अश्विनने 3 बळी घेतले. यासह त्याने इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिन्ही एडिशनमध्ये 50 हून अधिक बळी घेणारा अश्विन जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
भारत-बांगलादेश कसोटी सामन्याचा चौथा दिवस अतिशय रोमांचक ठरला. या दिवशी दोन्ही संघांनी मिळून 437 धावा केल्या आणि 18 विकेट्सही घेतल्या. यापैकी 3 विकेट अश्विनच्या खात्यात गेल्या. यासह अश्विनने WTC 2023-25 च्या चालू चक्रात 50 बळी पूर्ण केले. बांगलादेशच्या पहिल्या डावात शाकिबअल हसनला बाद करत अश्विनने ही कामगिरी केली. यानंतर बांगलादेशच्या दुसऱ्या डावातही अश्विनने 2 बळी घेतले.
38 वर्षीय आर अश्विनच्या नावावर आता WTC च्या चालू हंगामात 52 विकेट्स आहेत. त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स कोणीही घेऊ शकलेले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड 51 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विन आणि हेजलवूडनंतर पॅट कमिन्स (48) तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – ऑक्टोबरमध्ये शाळेच्या मुलांना भरपूर सुट्ट्या, ‘इतके’ दिवस बंद राहणार शाळा!
रवीचंद्रन अश्विनने यापूर्वी WTC च्या पहिल्या एडिशनमध्ये (2019-21) 71 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या एडिशनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. यानंतर दुसऱ्या एडिशनमध्ये त्याने 61 विकेट घेतल्या. एकूणच, अश्विनने WTC च्या तीन एडिशनमध्ये 37 सामन्यांत 182 विकेट घेतल्या आहेत. आणखी सहा विकेट घेतल्यानंतर तो नॅथन लायनला (187) मागे सोडेल.
कानपूर कसोटीबद्दल बोलायचे झाले तर भारताने बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावांवर रोखले. यानंतर भारताने 9 गडी बाद 285 धावा करत पहिला डाव घोषित केला. त्यामुळे बांगलादेशवर 52 धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताने बांगलादेशच्या दुसऱ्या डावातही 26 धावांत 2 गडी बाद केले. बांगलादेशवर आता सामना वाचवण्याचे दडपण आहे. बांगलादेशला लवकर बाद करून सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!